एखाद्या हिंदू मुलीने मुसलमान मुलाशी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करणे, ही नेहमीचीच बाब झाली आहे. नंतर त्या मुलीचे धर्मांध मुसलमान कशी अवस्था करतात, तेव्हा त्या मुलीचे हिंदू आई – वडील भीतीपोटी कसे मौन बाळगतात. त्या मुलीला ना सासरी कुणी वाली राहत, ना माहेरी, अशी त्या मुलीची कोंडी होते. मात्र एखादी मुसलमान मुलगी जेव्हा हिंदू मुलाशी विवाह करते तेव्हा मात्र तिचे माहेरचे लोक मुसलमान कट्टर धर्मांध बनतात. काही वेळा अशा मुलींचा खून केला जातो, अशाच अवस्थेतून जाहिदा अन्सारी उर्फ राधिका यादव (Radhika Yadav) ही महिला जात आहे. याविषयावर राधिका यादवने तिची कैफियत ‘हिंदुस्थान पोस्ट’ वर युट्युब चॅनलशी बोलताना मांडली.
माझे हिंदू मुलासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले, मी कुटुंबियांचा विरोध पत्करून त्याच्याशी विवाह केला आणि स्वखुशीने हिंदू धर्म स्वीकारून ती राधिका यादव (Radhika Yadav) बनली. पण त्यानंतर माझे मुसलमानांनी जगणे कठीण बनवले. माझी आई जेव्हा रुग्णालयात मरणासन्न अवस्थेत होती, तेव्हा तिला पाहायला गेल्यावर मला मुसलमानांनी माझ्या आईला बघायलाही परवानगी दिली नाही. कारण मी धर्म बदलून हिंदू बनल्याने त्यांच्या मते मी काफिर बनली आहे. त्यामुळे मी जर आईला बघितले किंवा तिला स्पर्श केला तर माझी आई दोजकमध्ये जाईल म्हणजे नरकामध्ये जाईल, असे ते म्हणू लागले. माझ्या आईचा मृत्यू झाला तरी मला अंतिम संस्कारामध्ये सहभागी होऊ दिले नाही, असे राधिका यादव (Radhika Yadav) हिने सांगितले.
त्यानंतर काही मुसलमानांनी मला तू हालाला केलास तरच तुला आम्ही स्वीकारू, हालाला म्हणजे मी परिचित एखाद्या मुसलमानासोबत एकदा शारीरिक संबंध ठेवून पवित्र होणे. यावर मी आक्षेप नोंदवला आहे. असे केल्याने पवित्र होणे ही संकल्पना मुळातच स्त्री जातीची विटंबना आहे, मला आईच्या मालमत्तेचा हक्क मिळावा म्हणून मी संघर्ष करत आहे, मात्र मला कुणीही सहाय्य करत नाही. आता मला मुसलमान जीवे मारण्याची धमकी देत आहेत, माझा मानसिक छळ करत आहेत. मला ३ मुले आहेत, त्यांनाही ठार मारण्याची धमकी देत आहेत, तिला ६ महिन्याची मुलगी आहे, तिच्यावरही बलात्कार करण्याची धमकी देत आहे, असेही राधिका यादवने (Radhika Yadav सांगितले.
मी या सर्व छळाच्या प्रकरणी पोलिसांकडे न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, मी मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेली परंतु पोलीस माझ्याकडे दुर्लक्ष करत होते, तासनतास बसल्यावर माझी एनसी लिहून घेतली, पण त्याउपर जाऊन मला संरक्षण देण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलीस करत नाहीत, असे राधिका यादव म्हणाली. माझ्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेण्यात आले आहेत, माझ्या घरासमोर कचरा टाकत आहेत, घरासमोर मुसलमान नशेबाजी करत आहेत. बकऱ्या बांधून ठेवत आहेत. अशा प्रकारे मुसलमान मला घर सोडून पळून जाण्यासाठी बाध्य करत असल्याचे राधिका म्हणाले. निदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी माझी कैफियत ऐकून घ्यावी आणि मला न्याय द्यावा, अशी मागणी राधिका यादव (Radhika Yadav केली आहे.
Join Our WhatsApp Community