पाकिस्तान (Pakistan) सरकार कुठल्याही किंमतीत हे पाऊल उचलू शकत नाही. हाफीज सईदवर (Hafiz Saeed) भारताने लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, हे पाकिस्तानी एजन्सी आणि सरकारला चांगले माहिती आहे. भारत कायम हाफीज सईदविरोधात अजेंडा चालवत आहे. पाकिस्तानचे सरकार कधीही सईदला भारताला सोपवण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे हा प्रश्नच येत नाही, असे उत्तर हाफीज सईदचा मुलगा तल्हा सईदने दिले आहे.
(हेही वाचा – Indus Water Treaty स्थगित करण्याच्या निर्णयामुळे पाकड्यांचा सुकला गळा; एकामागोमाग एक पत्रे लिहून भारताला करतोय विनंत्या )
मुंबईवर २६/११ ला झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा (26/11 Mumbai Attack) मास्टरमाईंड आणि कुख्यात दहशतवादी हाफीज सईद सध्या पाकिस्तान सरकारच्या सुरक्षेत असल्याचा दावा हाफीज सईदचा मुलगा तल्हा सईदने केला आहे. ‘हाफीज सईज आरामात जगत आहेत. पाकिस्तान सरकार कधीही त्यांना भारताला सोपवण्याचा विचारही करणार नाही, असा पूर्ण विश्वास आहे’, असे तल्हा याने म्हटले आहे.
एका मुलाखतीत तल्हा सईदने हे विधान केले आहे. मागील काही काळापासून तल्हा सईद (Talha Saeed) सातत्याने पाकिस्तानच्या मीडियात आणि सार्वजनिक कार्यक्रमात दिसून येत आहे. हाफीद सईदच्या ढासळत्या प्रकृतीमुळे तल्हाने त्याची जागा घेतल्याचे बोलले जाते. तल्हा सईदच्या मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तल्हाला विचारण्यात आले की, पाकिस्तान सरकार भारताची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण करत हाफीज सईदला त्यांना सोपवू शकते का?, त्यावर तल्हाने उत्तर दिले.
तसेच हाफीज सईदची (Hafiz Saeed) प्रकृती आणि जेलमधील अनेक गोष्टींवर विविध चर्चा होत आहे. हाफीद सईद जेलमध्ये आहे की, घरी आहे असा सवाल विचारला गेला. त्यावर हाफीज सईद पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या ते कुराणचे विश्लेषण लिहित आहेत. इबादतमध्ये ते त्याचा जास्त वेळ घालवतात. ते पूर्ण दिवस बिझी असतात आणि त्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे, असेही तल्हा सईदने मुलाखतीत स्पष्ट केले.
या मुलाखतीमुळे पाक सरकार भारताला वारंवार चकवा देत असल्याचेच स्पष्ट होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community