उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहलगाम हल्ल्यात (Pahalagam Attack) ठार झालेले शुभम द्विवेदी यांची पत्नी एशान्या ढसाढसा रडू लागली. तिने सांगितले की, दहशतवाद्यांनी माझ्या पतीला माझ्यासमोर गोळ्या घातल्या. योगीजी, तुम्ही त्यांचा बदला घ्या. मला कठोर बदला घ्यायचा आहे. मग ती रडू लागते. मुख्यमंत्री योगी यांनी शुभमच्या पत्नीला आश्वासन दिले की, दहशतवाद्यांच्या शवपेटीचा शेवटचा खिळा मी ठोकेन, असे ते म्हणाले. दरम्यान, शुभमचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, कवडीमोल किमतीच्या दहशतवाद्यांनी आम्हाला ठार केले.
यावेळी शुभमच्या पत्नीने मुख्यमंत्री योगी यांनी घडलेली सर्व घटना सांगितली. शुभम आणि मी मॅगी खात असतानाच मागून एक माणूस आला. बंदूक बाजूला ठेवून त्याने विचारले, तू हिंदू आहेस की मुस्लिम? मग तो म्हणाला, जर तू मुस्लिम असशील तर कलमा पठण कर. मला काहीच समजले नाही आणि हसून तो म्हणाले, मी हिंदू आहे. हे ऐकताच त्या अतिरेक्याने त्याला गोळी घातली. प्रथम शुभमला मारण्यात आले, नंतर इतरांना ठार करण्यात आले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, या घटनेवरून असे दिसून येते की दहशतवाद आता शेवटचा श्वास घेत आहे. (Pahalagam Attack) येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणे, त्यांच्यासमोर बहिणी-मुलींचे कुंकू पुसणे, हे कोणताही सुसंस्कृत समाज स्वीकारू शकत नाही. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, विशेषतः भारतात. भारत सरकारच्या दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणामुळे दहशतवादाचे प्रभावीपणे उच्चाटन होईल. ते कालपासूनच सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.
Join Our WhatsApp Community