-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याची पातळी आता वाढू लागली असून मागील दोन ते तीन दिवसांपासून भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांमधील राखीव साठ्यातून पाणी उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु आता पाणीसाठा १३ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे महापालिकेला राखीव साठ्यातून पाणी उचलण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या नाशिकसह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद होवून काही भाग जलमय झालेले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये धरण आणि तलावांमधील पाणीसाठा मोठ्याप्रमाणात वाढला जाण्याची शक्यता आहे. (BMC)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये १९ जून पर्यंत १३ टक्के एवढा पाणीपुरवठा जमा झाला असू मागील वर्षी हा पाणी साठा ५.३३ टक्के आणि त्या आधीच्या वर्षी ७.९८ टक्के एवढा पाणीसाठा जमा होता. या सर्व धरणांमध्ये एकूण १ लाख ९० हजार ७७१ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे तर मागील वर्षी हा पाणीसाठा ७७ हजार १३२ दशलक्ष लिटर होता आणि त्या आधीच्या वर्षी १ लाख ५४ हजार ४३० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. (BMC)
(हेही वाचा – Water Cut : कुर्ल्यासह पवई आणि विक्रोळीकरांनो रविवारीच भरुन ठेवा पाणी; कारण…)
त्यामुळे मे महिन्यांमध्ये जेव्हा सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी होऊ लागल्याने महापालिकेने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांतून राखीव पाणीसाठा उचलण्यास जलसंपदा विभागाकडून परवानगी मिळवली होती. त्यानुसार १० टक्क्यांखाली जलसाठा झाल्यास हा राखीव पाणीसाठा उचलण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्यास सुरुवात केली होती. परंतु आता या पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमध्ये पाणीसाठा १३ टक्क्यांवर पोहोचल्याने महापालिकेला आता राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्याची गरज भासणार नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे धरण आणि तलावांमध्ये जलसाठा वाढण्याची दाट शक्यता असून हा अशाचप्रकारे जलसाठा वाढू लागल्याने राखीव जलसाठ्यातून पाणी उचलण्याची गरज यापुढे लागणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. (BMC)
(हेही वाचा – BMC : भटक्या कुत्र्यांना आणि मांजरींना खायला घालणाऱ्यांना रोखाल तर दाखल होईल गुन्हा; का ते वाचा)
मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत
मुंबई शहराला सध्या तानसा (४५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन), मोडक सागर (वैतरणा) (४५५ द. ल. लि. प्रतिदिन), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ द. ल. लि. प्रतिदिन), अप्पर वैतरणा (६४० द. ल. लि. प्रतिदिन) आणि भातसा (२०२० द. ल. लि. प्रतिदिन) या जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० कि. मी. किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आहेत. विहार (१०० द. ल. लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द. ल. लि. प्रतिदिन) आहेत. मुंबईला या सर्व धरण तथा तलावांतून एकूण ४१०० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community