Water Metro : मुंबईत वाहतूक क्रांती, लवकरच अडीच हजार कोटींचा प्रकल्प राबविणार; कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा

66
Water Metro : मुंबईत वाहतूक क्रांती, लवकरच अडीच हजार कोटींचा प्रकल्प राबविणार; कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा
  • प्रतिनिधी

मुंबईकरांना लवकरच जलमार्गाने मेट्रोचा अनुभव घेता येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच वास्तवात उतरणार आहे. मत्सव्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले असून, विकास आराखडा तीन महिन्यांत सादर करण्याचाही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. (Water Metro)

मुंबईत वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीला सोपविण्यात आले होते. या कंपनीने तयार केलेला अहवाल नुकताच मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, “मुंबईमध्ये जलवाहतुकीची अफाट संधी असून, विशेषतः बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या भागांत वॉटर मेट्रो प्रभावी ठरू शकते. त्यामुळे मार्ग निवडताना जास्तीत जास्त प्रवासी संख्येचा विचार करावा.” ते पुढे म्हणाले, “वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावेत. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत येण्यासाठी वॉटर मेट्रो हा उत्तम पर्याय ठरेल. प्रवासाचा वेळ आणि ताण कमी होईल.” (Water Metro)

(हेही वाचा – PM Narendra Modi : कॅनडातील अल्बर्टामध्ये जी-७ शिखर परिषदेची बैठक; पंतप्रधानांच्या दौऱ्यावर खलिस्तान्यांचं संकट?)

विकास आराखड्यात काय असेल?

कोची मेट्रोने सादर केलेल्या अहवालानुसार, वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी २९ टर्मिनल्स उभारण्यात येणार असून १० मुख्य मार्गांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रवासी सुविधांसह जेटी टर्मिनल्स, बोटींची खरेदी, आणि इतर संबंधित पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पावर अंदाजे २५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंत्री राणे यांनी सूचित केले की, “वॉटर मेट्रो टर्मिनल्सचा विकास मेट्रोच्या धर्तीवर करावा. त्यांना रस्ते, रेल्वे व अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी जोडण्यासाठी स्वतंत्र वाहतूक यंत्रणा निर्माण करावी.” (Water Metro)

मुंबईच्या वाहतुकीसाठी हा प्रकल्प “गेम चेंजर” ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून येत्या काही महिन्यांत वॉटर मेट्रोचा आराखडा अंतिम रूपात समोर येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी जलवाहतूक स्वप्नवत वास्तवात रूपांतरित होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. (Water Metro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.