वक्फ बोर्डाने गरिबांसाठी एकही शाळा उघडली आहे का? जर वक्फचा योग्य वापर केला गेला, तर लोकांना या कार्यक्रमात येण्याची गरज भासणार नाही. कुराणात गरिबांना मदत करण्याचे सांगितले आहे. मला विचारायचे आहे की, जर वक्फ दुर्बल आणि गरिबांना मदत करण्यासाठी नाही, तर ते कशासाठी आहे ? पाटण्यातील कोणतेही रुग्णालय, अनाथाश्रम किंवा धर्मादाय संस्था वक्फ चालवत आहेत का ? वक्फ जमिनीवर (Waqf Board) तुम्हाला मोठ्या इमारती आणि व्यावसायिक संकुले आढळतील पण शाळा नाहीत, असा टोला बिहारचे राज्यपाल आरिफ महंमद खान (Arif Mohammad Khan) यांनी लगावला आहे.
(हेही वाचा – Fraud : बनावट टूर ऑपरेटरकडून ७२ डॉक्टरांची २ कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल)
अखिल भारतीय संयुक्त मुस्लिम मोर्चाची (All India United Muslim Morcha) पसमंडा परिषद डॉ. एजाज अली यांनी आयोजित केली होती. ऑल इंडिया मुस्लिम फ्रंटच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राज्यपाल बोलत होते.
या वेळी राज्यपाल आरिफ महंमद खान (Arif Mohammad Khan) यांनी मुसलमान समाजाला शिक्षणावरूनही खडसावले. ते म्हणाले, संविधानात कुठेही अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात नाही. संविधानात सर्वांना समान अधिकार देण्यात आले आहेत. जर तुम्ही अल्पसंख्यांक हा शब्द वापरत असाल तर याचा अर्थ तुम्ही कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. श्रीमंत मुस्लिमांची मुले अमेरिकेत शिकतील आणि गरीब लोकांची मुले मदरशांत शिकतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community