‘व्हिजन 2047’ मच्छिमारांसाठी दिशादर्शक ठरेल; Nitesh Rane यांनी व्यक्त केला विश्वास

वातावरण बदलाचा परिणाम, AI व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, किनारपट्टी सुरक्षा यांसह सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंट तयार करा – मंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश

76
‘व्हिजन 2047’ मच्छिमारांसाठी दिशादर्शक ठरेल; Nitesh Rane यांनी व्यक्त केला विश्वास
  • प्रतिनिधी 

“मत्स्यव्यवसाय विभागाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट 2047’ हे वास्तवदर्शी, प्रयोगशील आणि भविष्याभिमुख असावे. वातावरण बदलामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर होणाऱ्या परिणामांची दखल घेऊन लोकाभिमुख उपाययोजना त्यात असाव्यात,” असे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले आहेत.

सोमवारी मंत्रालयात ‘व्हिजन 2047’ संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मंत्री राणे (Nitesh Rane) बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय सचिव एन. रामास्वामी, आयुक्त किशोर तावडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – “…तर याहून वेदनादायी दुसरं काहीच असू शकत नाही”; Veer Savarkar पुरस्कार सोहळ्यात विवेक फणसळकरांनी मांडली परखड भूमिका)

वातावरण बदलाचा धोका – व्यवसाय ठप्प

मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी यंदा पावसाळा २० दिवस लवकर सुरू झाल्याचे सांगत, “याचा थेट परिणाम मच्छिमारांच्या व्यवसायावर झाला आहे. २० दिवस जास्त बंदीमुळे उत्पन्नाचा स्रोत ठप्प झाला आहे. त्यामुळे 2047 पर्यंत हवामान बदलामुळे काय परिणाम होतील आणि त्यावर कोणते उपाय करता येतील, याचा गांभीर्याने विचार या व्हिजनमध्ये असावा,” असे स्पष्ट केले.

जागतिक अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा वापर

व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना जपान, इंडोनेशिया, नॉर्वे, स्वीडन, इस्त्राईल यासारख्या मत्स्यव्यवसायात आघाडीवर असलेल्या देशांचे मॉडेल अभ्यासण्याचे आणि केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू यासारख्या प्रगत राज्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

“एआय (AI), आधुनिक तंत्रज्ञान, सोलर ऊर्जा यांचा वापर, महिला मच्छिमारांचे सशक्तीकरण, मच्छीमार बंदरांचा आणि बाजारांचा आधुनिकीकरण या सर्व बाबी व्हिजनमध्ये समाविष्ट झाल्या पाहिजेत,” असे त्यांनी अधोरेखित केले.

(हेही वाचा – Mumbai Rain : मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले)

संपूर्ण मत्स्यव्यवसायाचा सर्वांगीण विचार आवश्यक

या डॉक्युमेंटमध्ये केवळ मच्छिमारीच नव्हे तर किनारपट्टी सुरक्षा, मत्स्यउत्पादन साखळीतील सर्व घटक, बाजार व्यवस्थापन, ताजेपणा टिकवणारी साधने, तसेच निर्यातक्षम दर्जा राखण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत याचाही सखोल विचार होण्याची गरज त्यांनी मांडली.

‘व्हिजन 2047’ – भविष्याचा आराखडा

या सर्व सूचना आणि धोरणात्मक विचारांच्या आधारे तयार होणारे ‘व्हिजन डॉक्युमेंट 2047’ हे राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या विकासाला नवीन दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.

या दृष्टिकोनातून पाहता मत्स्यव्यवसाय विभागाचे ‘व्हिजन 2047’ हे केवळ एक दस्तऐवज नसून, समुद्रकिनाऱ्याशी जोडलेल्या लाखो मच्छिमारांच्या उज्ज्वल भविष्याचा आधार ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.