Vishalgad Bakri Eid : विशाळगडावरील उरुसाला उच्च न्यायालयाची परवानगी; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना संतप्त

85

कोल्हापुरात विशाळगडावरील उरुसाला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना (Hindutva Organization) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी विशाळगडचा मुद्दा लावून धरला असून न्यायालयाच्या निकालानंतर संताप व्यक्त केला आहे. (Vishalgad Bakri Eid) विशाळगड किल्ल्यावरील दर्यावर बकरी ईद आणि उरूस करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) परवानगी दिली आहे. तसेच काही नियम व अटी पाळून प्राण्याची कुर्बानीही देण्यास न्यायालयाची मंजुरी आहे.

(हेही वाचा – Bangalore Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीआधी चेंगराचेंगरी; ११ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी)

7 ते 12 जून या कालावधीत न्यायालयाने ही परवानगी दिली. मात्र, बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार कमी पडल्याचा आरोप आता हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. विशाळगडच्या उरुसावर कायमस्वरुपी बंदी घाला, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

विशाळगडावर (Vishalgad) मलिक रेहानबाबा यांचा दर्गा (Malik Rehan Dargah) आहे. येथे बकरी ईद आणि उरूस साजरा केला जातो. यासाठी येथे कुर्बानी म्हणून प्राणी आणि पक्षी यांचा बळी देतात. मात्र, विशाळगड हा संरक्षित स्मारकांच्या यादीत असल्याने येथे बळी देऊ नये, असे आदेश राज्य पुरातत्त्व विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद यांनी वेळोवेळी नोटीस बजावून दिले होते. याच्या विरोधात मलिक रेहान दर्गा ट्रस्ट यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आता न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती नीला के. गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पी. पूनावाला यांच्यासमोर ही सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे सतीश बी. तळेकर आणि माधवी अय्यपन यांनी युक्तीवाद केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.