Veer Savarkar : तब्बल १०२ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरां(Veer Savarkar)नी इसेंशियल ऑफ हिंदुत्व या ग्रंथात हिंदू धर्म व संस्कृतीची विस्तृत व्याख्या केली. पण हे विवेचन समजून समजून न घेता सावरकर(Veer Savarkar)बंधूंवर विखारी टीकाच अनेकांनी केली, असे विधान नारायणराव सावरकरांचे नातू तथा हर घर सावरकर समितीचे कार्यवाह सात्यकी सावरकर यांनी केले. ते म्हणाले, विखारी टीका आजही होत असतानाच स्वातंत्र्यासाठी संपूर्ण घरावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या सावरकरबंधूंचा व कुटुंबाचा अवमान अजून किती सहन करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.(Veer Savarkar)
(हेही वाचा Iran-Israel War : इराणवरील हवाई हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी संसदेत अजब तर्कट; अध्यक्ष म्हणाले… )
दरम्यान, स्वातंत्र्याच्या धगधगत्या कुंडात प्राणांची आहुती देऊनही आजन्म उपेक्षित राहणान्या गणेश दामोदर सावरकर उपाख्य बाबाराव सावरकरांच्या राष्ट्रकार्यावर आधारित ‘बाबाराव सावरकर – एक उपेक्षित राष्ट्रभक्त’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सात्यकी सावरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द कवी, नाटककार अनिल शेंडे, पुस्तकाच्या लेखिका भाग्यश्री नियोगी-करजगावकर, वैनायक ग्रंथालयाचे अध्यक्ष वीरेंद्र देशपांडे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शंकरनगर येथील शेवाळकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(हेही वाचा Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन ! )
वीरेंद्र देशपाडे म्हणाले, बाबाराव सावरकरांच्या जन्मदिनी हे पुस्तक प्रकाशित होणे हा खूपच मोठा योगायोग आहे. बाबाराव हे क्रांतिकारकांच्या प्राणांचे प्राण होते. त्यांची हिंदुत्वनि ष्ठा कमालीची होती. पण ती आज आपल्याला ठाऊकच नाही ते केवळ स्वातंत्र्यवीरांचे बंधू एवढीच ओळख आपल्याला ठाऊक आहे. बाबारावांचे कार्य समाजासमोर नव्याने आणण्याचे शिवधनुष्य भाग्यश्री नियोगी यांनी लीलया पेलले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, अध्यक्षीय भाषणात अनिल शेंडे यांनी पुस्तकाच्या रूपाने बाबाराव सावरकरांच्या व्यक्तित्वाचा दस्तावेजच समाजासमोर आल्याचे मनोगतात सांगितले.
पुस्तकाच्या लेखिका भाग्यश्री नियोगी काय म्हणाल्या?
पुस्तकाच्या लेखिका भाग्यश्री नियोगी यांनी पुस्तकाविषयी भूमिका विशद करताना म्हणाल्या, जन्मदिनीच त्यांना जन्मठेप हा दुर्दैवी योग असल्याची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, सावरकर बंधूंना हवा तो सन्मान का मिळाला नाही. ही भावना सतत माझ्या मनात येत होती. अंदमानात स्वातंत्र्यवीरांसह बाबारावही शिक्षा भोगत होते. पण, तिथेही त्यांच्या आठवणीचा साधा लवलेशही नाही. बाबारावांचे माहिती नसलेले कार्य समाजासमोर यावे, या एकाच ध्यासाने पुस्तकाची निर्मिती झाल्याचेही त्यांनी सांगितले.(Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community