Veer Savarkar : गोव्यात “कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!” नाटकाच्या ५१व्या प्रयोगाचे सादरीकरण

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त 'कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!' या नाटकाचा ५१वा प्रयोग सोमवार, ०२ जून २०२५ दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन, साखळी, गोवा येथे संपन्न झाला.

115

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर(Veer Savarkar) यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त ‘कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!’ या नाटकाचा ५१वा प्रयोग सोमवार, ०२ जून २०२५ दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन, साखळी, गोवा येथे संपन्न झाला. सावरकरां(Veer Savarkar)च्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन, साखळी येथे ‘मधुबिंब, मुंबई’ निर्मित ‘कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!’ नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

या नाटकाच्या माध्यमातून वीर सावरकरां(Veer Savarkar)ची अनोळखी बाजू उपस्थितांसमोर प्रभावीपणे दिसली. वीर सावरकर ज्या जिद्दीने, ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीसाठी लढले याची समर्पक मांडणी या नाटकाच्या माध्यमातून दिसून आली. तसेच, मराठी भाषेच्या शब्दकोषाला अनेक शब्द सावरकरां(Veer Savarkar)नी दिले होते. कविता संग्रह, नाट्य लिखाण आणि नाट्यपदाला चालही त्यांनी लावली होती. यासर्व आठवणी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या.

(हेही वाचा अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याच्या प्रकरणात मंत्री Nitesh Rane यांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाने काय म्हटलं? )

दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर, चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर, संगीतकार सुधीर फडके, लोकमान्य टिळक, मंगेशकर कुटुंबीय, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेक दिग्गजांशी वीर सावरकरांचे असलेले वैयक्तिक संबंध या नाटकातून उलगडण्यात आले आहेत. तसेच, कुटुंबातील प्रत्येकाशी अतिशय भावनिक नाते जपणारे सावरकर, आणि त्यांच्या पत्नी माई बरोबर असणारे जिव्हाळ्याचे संबंध त्यासोबतच एका राजकीय नेत्याचा अराजकीय प्रवास या नाटकातून उलगडत जातो.

HDFC 5 1

या नाटकाचे विशेष म्हणजे ज्या कार्यासाठी आपला जन्म झाला, ते कार्य पूर्ण झाले म्हणून आत्मसमर्पणाची तयारीही योग्य वेळी करणारे सन्यस्त वैरागी. हे आणि असे अनेक पैलू असलेल्या वीर सावरकरांच्या आयुष्यातील गोष्टींवर प्रकाश टाकणाऱ्या नाटकाला उपस्थितांनी भरभरून दाद यावेळी दिली. या नाटकाचे लेखन व गीत लेखन अनंत शंकर ओगले यांनी केले आहे. तसेच, दिग्दर्शन व वीर सावरकरांच्या प्रमुख भूमिकेत यतिन ठाकूर तर माई सावरकरांची भूमिका योगिता बेडेकर यांनी साकारली आहे.(Veer Savarkar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.