संपूर्ण देशातील विविध मार्गांवर वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Train) यशस्वी धाव सुरू आहे. काश्मीरमध्ये अद्यापपर्यंत वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नव्हती. आता ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात, असा कयास बांधला जात आहे. कटरा ते श्रीनगर (Katra to Srinagar) या मार्गावर ही वंदे भारत आठवड्यातून ६ दिवस धावेल.
(हेही वाचा – Pakistani Spy: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; ऑपरेशन सिंदूरची माहिती पाठवणाऱ्या गुप्तहेराला अटक)
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे जम्मू (Jammu) आणि श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. सध्या काश्मीर खोऱ्यातील (Kashmir Valley) रेल्वे सेवा फक्त बारामुल्ला ते सांगलदान या मार्गादरम्यान मर्यादित आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस कटरा ते श्रीनगर आणि बारामुल्लापर्यंत थेट जाईल. पूर्वी रस्त्याने हा प्रवास करण्यासाठी ६ ते ७ तास लागायचे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा प्रवास ३ तासांत पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणती स्थानके घेणार ? वेळापत्रक काय असणार ?
ही वंदे भारत ट्रेन ती कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटेल आणि श्रीनगरला सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच वंदे भारत ट्रेन श्रीनगरहून दुपारी १२.४५ वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरून वंदे भारत ट्रेन धावेल. रियासी, सांगलदान, बनिहाल, काजीगुंड, अनंतनाग आणि अवंतीपोरा या स्थानकांवर थांबेल. यामुळे या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल. वंदे भारत एक्स्प्रेस चिनाब पुलावरून जाईल. त्यामुळे या प्रवासाचे हेही एक प्रमुख आकर्षण मानले जात आहे.
कसा आहे कटरा ते श्रीनगर प्रवास ?
या मार्गावर ३६ बोगदे आहेत. रेल्वे मार्गावर ९४३ पूल आहेत. १६४ किमीचा प्रवास बोगदे आणि पुलांमधून केला जाईल. कटरा-रियासी या मार्गावर देशातील पहिला रेल्वे केबल स्टे ब्रिज (Railway cable stay bridge) बांधण्यात आला आहे. भूकंप, वादळ किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, त्याच्या नियंत्रण कक्षाकडून तात्काळ अलर्ट जारी केला जाईल. गरज पडल्यास, ट्रेन मध्येच थांबवता येणे शक्य होणार आहे. रामबन जिल्ह्यातील खारी सुंबड मार्गादरम्यान देशातील सर्वांत लांब १२.७७ किमी लांबीचा बोगदा आहे. (Vande Bharat Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community