
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 जून रोजी कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. कटरा येथून धावणाऱ्या वंदे भारत गाडीला केवळ बनिहाल येथे थांबा देण्यात आलाय. त्यामुळे हा प्रवास अवघ्या 3 तासांत पूर्ण होता. गेल्या 7 जून पासून ही ट्रेन नियमित सुरू झाली असून शेकडो प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. (Vande Bharat Express)
(हेही वाचा – 11 years of Modi Government : मोदी सरकारची ११ वर्षे : भारताच्या प्रगतीची अभूतपूर्व गाथा)
दिल्लीहून कटऱ्यापर्यंत दोन वंदे भारत ट्रेन चालतात. या व्यतिरिक्त, आता कटरा ते श्रीनगरदरम्यानही 2 वंदे भारत ट्रेन उपलब्ध असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 4 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. दिल्ली ते कटरा प्रवासाला सुमारे 8 तास, आणि कटरा ते श्रीनगर प्रवासाला फक्त 3 तास लागतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी जम्मू-काश्मीरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे. (Vande Bharat Express)
(हेही वाचा – कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनी लॅबमधील संशोधकाला FBI ने केली अटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड)
कटरा ते श्रीनगर वंदे भारत गाडीसाठी चेअर कार (715 भाडे) आणि एक्झिक्युटिव्ह क्लास (1320 भाडे) असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिली ट्रेन – कटरा येथून सकाळी 8.10 वाजता सुटते आणि 11.10 वाजता श्रीनगर येथे पोहोचते. ही ट्रेन श्रीनगरहून दुपारी 2 वाजता परत येते आणि संध्याकाळी 5.5 वाजता कटरा येथे पोहोचते. दुसरी ट्रेन – कटऱ्यावरून दुपारी 2.55 वाजता सुटते आणि संध्याकाळी 6 वाजता श्रीनगरला पोहोचते. या दोन्ही गाड्या (गाडी क्र. क्रमांक 26401 आणि 26402) मंगळवारी चालत नाहीत. (Vande Bharat Express)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community