-
प्रतिनिधी
राज्यभरातील शाळांमध्ये ‘क्लास बंक’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता धक्का बसणार आहे! शालेय शिक्षण विभागाने (Education Department) विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारण्यासाठी एक मोठा आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा हजेरी घेणे बंधनकारक करण्यात आले असून, गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती थेट पालकांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठवण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Aqua Line Metro पहिल्या पावसात भुयारी मेट्रोची दैना; वरळीतील आचार्य अत्रे स्थानकात भरलं पाणी प्रवाशांनी व्यक्त केला संताप!)
पहिली हजेरी सकाळी, दुसरी दुपारी आणि तिसरी सुटीच्या आधी घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत शाळांना डिजिटल हजेरी प्रणाली लागू करावी लागणार असून, शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निर्णयामागील उद्दिष्ट स्पष्ट आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करणे, गैरहजेरी रोखणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. शिक्षण विभागाने (Education Department) सांगितले की, पालकांपर्यंत थेट माहिती पोहोचल्याने विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि शाळेतील शिस्त वाढेल.
(हेही वाचा – Maharashtra Rain Update: राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग; मुसळधार पावसामुळे ‘या’ ठिकाणी झाले नुकसान)
मात्र, ग्रामीण भागातील शाळांमधून “हजेरी लावून शिक्षकच गायब” असा प्रकार सातत्याने समोर येत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या हजेरीवरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. या नव्या योजनेमुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही जागरूक व्हावे, आणि शिक्षणाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने उंचावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Education Department)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community