-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. मात्र, पवई तलावात (Powai Lake) येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येवू शकतो, असे मतप्रदर्शन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बी. एन. एच. एस.) प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्याची दखल घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांच्यासमवेत संवाद साधून त्यांच्या सल्ल्यानुसारच जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येणार आहे.
पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तरीही, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले होते.
(हेही वाचा – Shankhnad Mahotsav 2025 : युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणाऱ्यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला)
आजमितीला पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी काढण्याची कार्यवाही २ मशिनद्वारे सुरू आहे. ती अधिक प्रभावी होण्यासाठी तात्काळ ५ मशिन्स माध्यमातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) अधिकचे मनुष्यबळ वापरून जलपर्णी हटविण्याच्या कार्यवाहीस अधिक वेग देण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ६ मशिन्स तैनात करावीत. जलपर्णी काढल्यानंतर डम्पिंग ग्राउंड वर विनाविलंब विल्हेवाट लावली जाणार आहे. तलावातून जलपर्णी काढताना जैव विविधतेस कोणताही हानी पोहोचू नये, यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जाणार आहे. जलपर्णी काढण्याच्या कार्यवाहीत निसर्ग अभ्यासक, पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षक यांनी केलेल्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. या सुचनांचा यथायोग्य समावेश जलपर्णी काढण्याच्या कामांमध्ये केला जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या प्रतिनिधींनी तलाव क्षेत्रात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
पवई तलाव (Powai Lake) येथे कांस्यपंखी कमळपक्षी आणि जांभळी पाणकोंबडी यांचा अधिवास आहे. सामान्यपणे दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतचा कालावधी हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादन तथा विणीचा हंगाम म्हणून ओळखला जातो. जलपर्णी काढण्याच्या कामामुळे या पक्ष्यांनी घातलेली अंडी उबवण्यात अडसर निर्माण होऊ शकतो, पर्यायाने त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो, असे मतप्रदर्शन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रतिनिधींनी नोंदविले आहे. त्याची दखल घेऊन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षीनिरीक्षक यांच्यासमवेत संवाद साधण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिल्यानंतर आता त्यांच्याशी समन्वय साधूनच व त्यांच्या सल्ल्यानुसारच जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येणार आहे. या तज्ज्ञांसमवेत महानगरपालिकेचे अधिकारी पवई तलावास प्रत्यक्ष भेट देऊन जलवाहिनी मार्ग (हॉटेल वेस्टीन), गणेश घाट, पवारवाडी घाट आणि आय. आय. टी. मुंबई इत्यादी ठिकाणांची पाहणी करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community