
-
प्रतिनिधी
पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे वैभव असून ती निर्विघ्न, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुसज्ज व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सर्व यंत्रणांना काटेकोर नियोजनाचे स्पष्ट आदेश दिले आहेत. यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने वारकऱ्यांच्या सुरळीत प्रवासासाठी फिरती शौचालये, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, पोलीस बंदोबस्त आणि निवाऱ्याची जलरोधक मंडपांची सुसज्ज व्यवस्था केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी वारीपूर्व तयारीसंदर्भातील उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “वारीच्या मार्गावरील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने तत्काळ समन्वय बैठका घ्याव्यात आणि रस्ते, वीज, पाणी, आरोग्यसुविधा आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत करावे.”
(हेही वाचा – Karnataka Government : सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस सरकारला दणका; मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न फेल)
पुणे, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकांनी पालख्यांचे स्वागत वेगळ्या मंडपांत करावे, मात्र यामुळे पालख्यांना विलंब होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्याच्या विविध भागांमधून येणाऱ्या पालख्या नाशिक, विदर्भ, मराठवाडा आदी मार्गांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. त्यामुळे तिथल्या विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र उपाययोजना आखाव्यात, असेही त्यांनी सांगितले. वारी काळात कोणतीही पालखी पोलीस बंदोबस्ताविना फिरणार नाही, याची दक्षता पोलीस महासंचालकांनी घ्यावी, वाहतूक व्यवस्थाही अचूक असावी, असे आदेश देण्यात आले. यावर्षीही सर्व वारकऱ्यांसाठी समूह विमा योजना लागू असणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) यावेळी दिली.
(हेही वाचा – IPL 2025, RCB in Top 2 : जितेश शर्माला झेल जाऊनही बाद का दिला नाही? तो चेंडू नोबॉल का दिला?)
वारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे वाखरी – येथे सर्व मानाच्या पालख्या एकत्र येतात. त्यामुळे याठिकाणी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता “वाखरी मॉडेल वारकरी तळ” विकसित केला जाणार आहे. संत नामदेव महाराजांच्या ओट्याचा पुनर्विकास करण्यात येणार असून, वाखरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. पावसाचा विचार करून यंदा ३६ वॉटरप्रूफ मंडपांची उभारणी करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास यामध्ये वाढ केली जाईल. महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र स्नानगृहांची व्यवस्था केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट केले. वारी ही केवळ परंपरा नव्हे, ती आपली सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळे ही परंपरा आधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेच्या छायेखाली अधिक भव्यपणे पार पडावी, असा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community