हिंदुंच्या पुनरुत्थानाचा सोहळा; हिंदू साम्राज्य दिन अर्थात Shivrajyabhishek दिन

49

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Shivrajyabhishek : हिंदुंच्या मनात गुलामगिरीचं मळभ साचलं होतं. या हिंदुराष्ट्रावर शेकडो वर्षे परकीय आक्रमणे झाली परंतु हिंदुवीरांनी आपल्या बाहुबलाने ती आक्रमणे परतवून लावली. मात्र अरबस्तानातून आलेलं आक्रमण केवळ देशाच्या सीमा वाढवणारं आक्रमण नव्हतं तर आपली मूळ ओळख पुसून, आपली संस्कृती नष्ट करुन बलात्काराने वाळवंटी संस्कृती लादण्याचा हा कुटील डाव होता. वाळवंटातून आलेली संस्कृती ही तितकीच वाळवंटी, रुक्ष नि विकृतीला आलिंगन देणारी होती. धर्मयुद्ध जाणणार्‍या हिंदुंसाठी या सर्व गोष्टी नव्या व आश्चर्याचा दुःखद धक्का देणार्‍या होत्या. या वाळवंटी आक्रमणाविरुद्धही आपण जोरदार लढा दिला. मात्र हिंदू राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि सद्गुणविकृतीला बळी पडल्यामुळे या आक्रमणाला पुढे शरण जाऊ लागले. इतके की दिल्लीचा बादशाह हा जगदिश्वराप्रमाणे मानला जाऊ लागला. लहान सहान लढे सुरुच होते. मात्र हिंदुंच्या मनातलं राष्ट्र मेलं होतं. हिंदुस्थान हा केवळ एक भूप्रदेश होऊन गेला होता. सगळीकडे म्लेंच्छांचा हाहाकार सुरु होता. म्लेंच्छ पाहता पाहता सबंध हिंदुस्थान गिळंकृत करणार असं वाटत असताना सह्याद्रीच्या कुशीत एक आशेचा दिवा प्रज्वलित झाला. सोळा वर्षांच्या मुलाने ही अरबी विकृत वाळवंटी सत्ता नेस्तनाबूत करण्याची शपथ घेतली. जातीजातींमध्ये विखुरलेला मराठी माणूस या मुलाने एकत्र आणला. शिवाजी राजे भोसले हे नाव ऐकल्यावरच भल्याभल्यांचा धडकी भरु लागली. अफझलखानाचा कोथळा काढल्यानंतर शिवाजी महाराज हे नाव परदेशातही जाऊन धडकलं. म्लेंच्छ बिथरले, घाबरले… (Shivrajyabhishek)

(हेही वाचा – India Tour of Australia : रोहित, विराट यांचा ऑस्ट्रेलियात होणार सन्मान?, काय आहे कारण?)

कुणीही इतका व्यापक विचार केला नव्हता तो शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) केला. हे राष्ट्र आपले आहे, हिंदुंचे आहे, इथे परकीय सत्ता नको, इथे हवी आपली सत्ता, हिंदुंची सत्ता. आपले राज्य, हिंदुंचे राज्य म्हणून स्थापन झाले स्वराज्य… इस्लामी सत्तेच्या (Islamic rule) तुलनेत स्वराज्य इवलुसे होते. मात्र त्या रुक्ष वाळवंटी संस्कृतीसमोर छाती काढून सन्मानाने उभे होते. मोठमोठे जिहादी सरदार शिवरायांसमोर मात खाऊन पळू लागले. आता वेळ आली होती अधिकृत घोषणा करायची… हिंदू साम्राज्याचा जयघोष करण्याची… ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि शिवाजीराजे झाले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज… आज आहे पवित्र आणि गौरवशाली दिवस! हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा हा अमर दिवस!

ज्या दिवशी रायगडाच्या राजसभेत सप्तसिंधूंच्या पवित्र जलांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या क्षणापासून हिंदूंचं स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा अखंड ज्योत बनून संपूर्ण हिंदुस्थानात प्रज्वलित झाली. हा केवळ एका मराठ्याचा, एका राज्याचा किंवा एका समारंभाचा विजयोत्सव नव्हता, तर सबंध हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा सोहळा होता. आज, शेकडो वर्षांनंतरही, शिवछत्रपतींचा तो पराक्रमी आत्मा आपल्या देशात, आपल्या समाजात संचार करतो आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबासारख्या क्रूर आणि दडपशाही सत्तेला आव्हान देत स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली, तेव्हा त्यांनी केवळ रायगडावरच नव्हे, तर प्रत्येक हिंदूच्या मनात स्वाभिमानाचा अग्निकुंड पेटवला होता. ज्या काळात हिंदूंच्या मनात परकीय सत्तेची दहशत आणि न्यूनगंड खोलवर रुजली होती, त्या काळात शिवरायांनी आपल्या पराक्रमाने, धैर्याने आणि नीतिमत्तेने सिद्ध केलं की, हिंदू केवळ सेवक, सेनानी किंवा सरदारच नाही, तर स्वतंत्रपणे साम्राज्याचा मुकुट धारण करणारा छत्रपती होऊ शकतो. काहींना शिवरायांचे स्वराज्य इवलेसे रोप वाटेल. मात्र “काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी.” या कवी भुषणांच्या काव्यपंक्तीतून शिवरायांनी नेमका कोणत्या धाटणीचा पराक्रम केला होता याची जाणीव आपल्याला होते. आज आपण हिंदू आहोत ते केवळ या दोन पिता-पुत्तांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. जर हे दोन वीर पुरुष महाराष्ट्राच्या भूमीत अवतरले नसते तर जगातल्या अनेक देशांप्रमाणे ही हिंदू भूमी इस्लामी भूमी झाली असती. म्हणूनच हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

आज हिंदुस्थान हा एक स्वतंत्र, प्रगत आणि सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून जगात उभे आहे. परंतु, शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो. आजच्या काळात आपण भौतिक प्रगती, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाच्या शिखरावर आहोत, पण तरीही सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत. शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे स्वराज्याची स्थापना केली, ती केवळ सत्तेची स्थापना नव्हती, तर ती एका मूल्यव्यवस्थेची स्थापना होती. न्याय, समरसता, धर्म आणि स्वाभिमान यांवर आधारित स्वराज्य होते. त्यांनी दाखवून दिलं की, स्वराज्य म्हणजे फक्त भौगोलिक स्वातंत्र्य नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची भावना म्हणजे स्वराज्य.

(हेही वाचा – Sharmishtha Panoli Case : हिंदूंच्या धार्मिक भावना पालापाचोळा आहेत का?)

आज आपण जेव्हा डिजिटल युगात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जगत आहोत, तेव्हा शिवरायांची उणीव आपल्याला जाणवते. अनेक लोक शिवरायांना सेक्युलर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र खरं हे आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे हिंदू राज्य होतं… केवळ राज्य म्हणजे भूप्रदेश नव्हे तर ते हिंदूराष्ट्र होतं. त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी हिंदू राष्ट्राचं, हिंदू धर्माचं आणि हिंदू समाजाचं पुनरुत्थान केलं, तसंच आजही आपल्याला त्या सामर्थ्याची, त्या दृष्टीची आणि त्या धैर्याची आवश्यकता आहे. हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकाने आज हा संकल्प केला पाहिजे की, आपण शिवरायांचा हा वारसा पुढे नेऊ. त्यांच्या स्वराज्याच्या तोफांचा गडगडाट आजही आपल्या हृदयात घुमतो आहे. तो गडगडाट आपल्याला सांगतो की, हिंदू असणं हे कोणापेक्षाही भाग्यवान असणं होत! आजच्या तरुण पिढीने, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान, शिक्षण आणि संधी यांचं प्रचंड सामर्थ्य आहे, त्यांनी शिवरायांच्या विचारांचा अवलंब करून आपल्या देशाला आणि संस्कृतीला नव्या उंचीवर न्यावं. आपल्या प्रत्येक कृतीत शिवरायांचा स्वाभिमान, त्यांचं धैर्य आणि त्यांचं समर्पण झळकावं. हिंदू हा शब्द प्रत्येकाने स्वाभिमानाने उच्चारावा. या हिंदू साम्राज्य दिनी शिवरायांची ती प्रखर, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ स्फूर्ती आपल्या प्रत्येकाच्या अंगी संचारित होवो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना…

जय भवानी! जय शिवाजी! जय हिंदुराष्ट्र!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.