राज्यातील पोलिस भरतीला तात्पुरती स्थगिती, काय आहे कारण?

117

पोलिस भरतीसाठी इच्छुक असणा-या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात होणारी पोलिस भरती प्रक्रिया आता पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेला आता तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली असून पुढील आठवड्यात याबाबतचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच राज्य राखीव दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रिया देखील पुढे ढकलली गेली आहे.

भरती प्रक्रियेला स्थगिती

राज्यात पोलिस दलात 14 हजार 956 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या प्रक्रियेला नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होणार होती. पण आता या भरती प्रक्रियेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरतीच्या जाहिरातील स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत आता पुठढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

(हेही वाचाः नाशिक अपघातः ड्रायव्हरच्या लोभाने घेतले प्रवाशांचे प्राण, पोलिसांच्या अहवालात खुलासा)

काय आहे कारण?

मागील तीन वर्षांमध्ये राज्यात पोलिस भरती झालेली नाही. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक उमेदवार हे पोलिस भरतीसाठी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळावी, त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये. त्यामुळे या भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात निघणा-या नवीन जाहिरातीत वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.