छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची सफर घडविणाऱ्या विशेष Gaurav Express ट्रेन मुंबईतून रवाना; मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

47
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन टूर सुरु करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०९ जूनला सोमवारी सकाळी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी साडेसहा वाजता पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (Gaurav Express)

(हेही वाचा – हिंदुंच्या पुनरुत्थानाचा सोहळा; हिंदू साम्राज्य दिन अर्थात Shivrajyabhishek दिन)

आयआरसीटीसी (IRCTC), रेल्वे मंत्रालय, आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पाच दिवसांची सफर घडविणारी रेल्वे सोमवार ०९ जूनपासून विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेमधून पर्यटकांना राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट देता येणार आहे. या रेल्वेतील पर्यटकांना रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देता येणार आहे.
रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराजांनी 351 वर्षापूर्वी देश, देव आणि धर्माची लढाई जिंकली. स्वदेश, स्वराज्य आणि स्वभाषा या त्रिसूत्रीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. तोच आजचा दिवस आहे. त्यामुळेच आज आपलं अस्तित्व आहे. अतिशय पवित्र दिनी गौरव रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू केलं आहे. जिथे-जिथे शिवाजी महाराजांची पावले इतिहासात उमटली, तिथे रेल्वे जाणार आहे. रेल्वेत 710 प्रवासी आहेत, तर त्यामध्ये 150 हून अधिक महिला आहेत. भारताचा गौरव आणि प्रेरणा यासाठी तरुणाई रेल्वेतून जात आहे. राज्यातील सर्व भागातील प्रवासी आहेत. ही चांगली रेल्वे सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांचा आभारी आहे.”
(हेही वाचा – India Tour of Australia : रोहित, विराट यांचा ऑस्ट्रेलियात होणार सन्मान?, काय आहे कारण?)
भारत गौरव पर्यटन रेल्वेचं १०० टक्के बुकिंग झालेलं आहे. प्रवाशांची सर्व सुविधा रेल्वे विभागानं केली आहे. रेल्वेतील 80 टक्के प्रवासी हे 40 वर्षांहून कमी वयाचे आहेत. या रेल्वेतून शिवरायांचा इतिहास आणि वारसा दाखविण्याचा प्रयत्न आहे. असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.