
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या (Shivaji Park) परिसरातील झाडांच्या बुंध्याभोवती महापालिकेच्यावतीने सिमेंट काँक्रिटचे कठडे बांधण्यात आले आहेत. परंतु, कठडे बांधून दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरी या कठड्यांमध्ये लाल माती टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे हे कठड्यांचा अंतर्गत भाग हा कचरा कुंड्या म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे या कठड्यांमध्ये माती टाकायला महापालिका विसरली असून पावसाळा आला तरी झाडांच्या बुंध्याभोवती माती न टाकता याचा वापर कचरा कुंड्या म्हणूनच करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (Shivaji Park) डागडुजीचे काम हाती घेत या कामांतर्गत झाडांच्या बुंध्याभोवती विटांचे बांधकाम करून कठडे नव्याने बांधले गेले आहेत. स्थानिक आमदारांच्या माध्यमातून हे काम केल्याचा प्रचार शिवसेना उबाठाच्यावतीने केला जात होता. मात्र, हे कठडे बांधताना आधीच झाडांच्या मुळाभोवती नियमांप्रमाणेच सोडली जात नसून परिणामी या झाडांभोवती केल्या जाणाऱ्या कठड्यांच्या बांधकामाला भविष्यात तडे जावून ते तुटले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे झाडांना संरक्षण देण्यासाठी हे कठडे बांधले जात आहेत की कठडे लवकर तुटले जावून पुन्हा नव्याने बांधकाम करण्यासाठी त्यावर पुन्हा पैसे खर्च केले जावे यासाठी हे बांधकाम केले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत होता.
(हेही वाचा – एक्सपायर खाद्यपदार्थांची रिपॅकिंग करून विक्री! D-Mart आणि Khushi Trading विरोधात FDA ची धडक कारवाई; गुन्हा दाखल)
त्यातच आता दोन महिने झाले तरी या झाडांच्या बुंध्याभोवती कठडे बांधल्यानंतरही त्यात माती टाकण्याचा प्रयत्न महापालिकेच्या जी उत्तर विभाग तथा उद्यान विभागाच्यावतीने झालेला नाही. त्यामुळे या कठड्यांच्या आतील बाजूचा वापर पर्यटक आणि फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. झाडांच्या बुंध्याभोवती आणि कठड्याच्या आतील बाजूस लाल माती मोठ्याप्रमाणात टाकणे आवश्यक असतानाही याकडे ना आमदारांचे लक्ष आहे ना महापालिका प्रशासनाचे. त्यामुळे कठड्यांचे बांधकाम हे केवळ निधी खर्च करायचा म्हणून केला होता का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार झाडांभोवती कठड्यांची नव्याने बांधकाम करण्याची गरजच नसून जे यापूर्वी बनवले आहेत, त्यांना तडे गेले आहेत. तसेच त्यांच्या मुळांभोवती उंदिर, घुशींमुळे माती पोखरली जाते. उलट कठड्यांमुळे जागा जास्त अडली जात असून येथील झाडांच्या फांद्यांचे शास्त्रोक्तपणे छाटणी केल्यास तसेच मुळाभोवती हिरवळीचा पट्टा तयार करणेच योग्य आहे. पण हे कठडे बांधल्यानंतरही यापुढे भविष्यात त्यांना तडे जाणारच असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. (Shivaji Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community