काँग्रेसच्या टीकेला Shashi Tharoor यांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले, भारतात…

104
‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All-party delegation) तयार केले आहेत. सध्या हे शिष्टमंडळांनी अनेक देशांना भेट देऊन दहशतवाद (Terrorism) पोसणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला. काँग्रेस नेते शशी थरुर (Congress leader Shashi Tharoor) भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. ऑपरेशन सिंदूरचे यश आणि पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी ते जगभरात सध्या भारताची बाजू मांडत आहेत.पण, यादरम्यान काही काँग्रेस (Congress) नेते त्यांच्या अनेक विधानांवर नाराज असून, त्यांच्यावर सातत्याने टीकाही करत आहेत. अशातच, या सर्व टीकांवर थरूर यांनी आता उत्तर दिले आहे. (Shashi Tharoor)

(हेही वाचा – Simhastha Kumbh Mela 2027: भाविकांसाठी आनंदाची बातमी; २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा झाल्या जाहीर  )

टीकेवर शशी थरूर यांचे उत्तर
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या अनेक टीकांबाबत थरुर म्हणाले कि, ‘मला वाटते की, आपण आपले ध्येय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. एका समृद्ध लोकशाहीत टीका होणे साहजिक आहे. पण, मी यावेळी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. मी भारतात परत येईल, तेव्हा सहकाऱ्यांशी, टीकाकारांशी, माध्यमांशी बोलेन, त्यांना योग्य ते उत्तर देईन. सध्या आम्ही ज्या देशांमध्ये जात आहोत, त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि येथील लोकांपर्यंत भारताचा संदेश पोहोचवणे गरजेचे आहे,’ असे थरुर म्हणाले.
एकीकडे काँग्रेस शशी थरुर यांना लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे भाजपा त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे. भाजपा म्हणते की, विरोधी पक्ष असूनही शशी थरुर (Shashi Tharoor) यांना इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. ते ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. परंतु काही काँग्रेस नेते त्यांच्या कामावर टीका करत आहेत. यावरून काँग्रेसमधील निराशा आता हळूहळू बाहेर येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, काँग्रेस नेते उदित राज (Udit Raj) यांनी शशी थरुर यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले, परंतु त्यांनी काँग्रेसविरुद्ध विधाने देऊन हे स्पष्ट केले की, त्यांना काँग्रेसचे कल्याण नको आहे.

(हेही वाचा – बांगलादेशात चोराच्या उलट्या बोंबा; दहशतवादाला घाबरून पळालेल्या Shaikh Hasina यांनाच ठरवले हिंसाचारी)

काँग्रेस नेत्यांची टीका
दुसरीकडे, पवन खेरा (Pawan Khera) म्हणाले की, थरूर यांनी त्यांच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकवर (Surgical strike) टीका केली होती, परंतु आता ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) थरूर यांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा परराष्ट्र मंत्री बनवावे, कारण थरूर फक्त भाजपासाठी काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.