-
जयेश मेस्त्री
शर्मिष्ठा पनोली या तरुण विद्यार्थीनीने काही वादग्रस्त वक्तव्य केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. शर्मिष्ठा पानोली (Sharmishtha Panoli) २२ वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर (Influencer) देखील आहे. अलीकडेच तिने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने बॉलिवूड स्टार्सच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. असे म्हणतात की या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट पंथाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
१४ मे रोजी, एआयएमआयएमचे (AIMIM) प्रवक्ते वारिस पठाण (Waris Pathan) यांनी एक्सवर पानोलीचा व्हिडिओ फ्लॅग करुन दावा केला की ती इस्लामचा अपमान करत आहे. वारिस पठाण (Waris Pathan) यांच्या एक्सवरील पोस्टमुळे वादाला तोंड फुटले. १५ मे रोजी पानोलीने एक्सवर पोस्ट करत माफी मागितली आहे. ती म्हणाली की, ‘मी बिनशर्त माफी मागते. जे काही लिहिले आहे त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत आणि जाणूनबुजून कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. यापुढे मी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधगिरी बाळगीन, पुन्हा एकदा सांगते, कृपया मला क्षमा करा.’ शर्मिष्ठाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, कोलकात्याच्या गार्डनरीच पोलिस ठाण्यात वजाहत खानने (Wajahat Khan) रशिदी या हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्याने तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ३० मे रोजी कोलकाता पोलिसांनी गुडगावमधून पानोलीला अटक केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १९६(१)(अ), २९९, ३५२ आणि ३५३(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये धार्मिक भावना दुखावणे आणि सांप्रदायिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिने बिनशर्त माफी मागितल्यानंतरही अटक करण्यात आली आहे. (Sharmishtha Panoli Case)
(हेही वाचा – भारतात सुमारे ४४ टक्के शस्त्रक्रिया होतात बोगस; काय आहे Medical क्षेत्रातील गोरख धंदा?)
आता ज्या वजाहत खानने (Wajahat Khan) तिच्याविरुद्ध तक्रार केली तो स्वतः हिंदुंच्या देवी-देवतांवर गलिच्छ टिप्पणी करतो. त्याच्याविरुद्ध कामाख्या देवीविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल केस दाखल झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनीही या तक्रारीची दखल घेत बंगाल सरकारला खानाच्या अटकेबाबत मदत करण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी एका जिहादीने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसोबत अश्लील चाळे केले होते. स्वतः बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सनातन धर्माला ‘गंदा धर्म’ म्हटल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मग या लोकांना हिंदूंच्या भावना दुखावण्याचा अधिकार आहे का? तेव्हा का इतकं मोठं रान उठवलं गेलं नाही? या प्रकरणात तर शर्मिष्ठाने माफी मागितली आहे, त्यात तिचं वय लहान आहे. त्यामुळे माफी मागितल्यानंतर, व्हिडिओ डीलिट केल्यानंतर तिला अटक करणे हे न्याय्य आहे का? बरं, ज्याच्या तक्रारीवरुन अटक केली तो स्वतः धार्मिक भावना भडकवण्यात मास्टर माईंड आहे. आता तर श्री राम स्वाभिमान परिषदचे सचिव सुरज कुमार सिंह (Suraj Kumar Singh) म्हणाले की ‘शर्मिष्ठाविरुद्धच्या तक्रारीमागे कट्टर मुस्लिम संघटना स्काय फाऊंडेशनचा हात आहे आणि या संघटनेचे कार्यालय पाकिस्तानात आहे.’ त्यांनी असाही दावा केला की तिला अटक केल्यानंतर या संघटनेच्या लोकांनी जल्लोष केला. (Sharmishtha Panoli Case)
ही विकृती इतकी वाढली आहे की शर्मिष्ठाला बलात्कार करण्याची व मारण्याची धमकी येत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांना शर्मिष्ठाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. एनएचआरसी सदस्य प्रियांक कानुंगो म्हणाले की, शर्मिष्ठाला अटक झाल्यापासून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या अनेक धमक्या मिळत आहेत, त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की कुणीही हिंदू धर्मावर टिप्पणी करणार, मंदिरांची विटंबना करणार, देवी-देवतांची टिंगल उडवणार, अश्लील चाळे करणार, हिंदुंची कत्तल करणार, बलात्कार करणार तेव्हा त्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे? तेव्हा असा सवाल उपस्थित होतो की हिंदुंच्या धार्मिक भावना पालापाचोळा आहेत का? (Sharmishtha Panoli Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community