Rohingya : बांगलादेश आणि म्यानमार छावण्यांमधून पळून जाताना ४२७ रोहिंग्यांचा बुडून मृत्यू

५१४ लोकांपैकी फक्त ८७ जण वाचले, उर्वरित ४२७ जणांचा मृत्यू झाला.

106
दोन आठवड्यांपूर्वी म्यानमारच्या किनाऱ्याजवळ दोन बोटी उलटल्यानंतर सुमारे ४२७ रोहिंग्यांचा (Rohingya) मृत्यू झाल्याची भीती आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीने (UNHCR) दिली आहे. वृत्तानुसार, बोटीतील रोहिंग्या एकतर बांगलादेशातील कॉक्स बाजारातील रोहिंग्या छावण्यांमधून पळाले असावेत किंवा म्यानमारच्या पश्चिम राखीन राज्यातून पळाले असावेत.
UNHCR ने शुक्रवारी, २३ मे २०२५ या दिवशी सांगितले की, सुमारे ५१४ रोहिंग्यांना (Rohingya) घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्या. पहिली बोट ९ मे २०२५ रोजी बुडाली, त्यात २६७ लोक होते आणि फक्त ६६ जण वाचले. दुसरी बोट १० मे २०२५ रोजी उलटली, त्यात २४७ लोक होते आणि फक्त २१ जण वाचले. माहितीनुसार, ५१४ लोकांपैकी फक्त ८७ जण वाचले, उर्वरित ४२७ जणांचा मृत्यू झाला. जोरदार वारे आणि खराब हवामानामुळे बोटी बुडाल्याचे मानले जात आहे. UNHCR चे म्हणणे आहे की, रोहिंग्या (Rohingya) लोक प्रवास करून आपला जीव धोक्यात घालत आहेत कारण त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे आणि त्यांना खूप कमी मदत मिळत आहे. १४ मे २०२५ रोजी, म्यानमारहून येणारी आणखी एक बोट अडवण्यात आली, ज्यामध्ये १८८ रोहिंग्या होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.