‘ऑपरेशन सिंदूर’नंतर (Operation Sindoor) आपल्या देशात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत जाण्याचा आपल्या देशाने इशारा दिला होता. (Rohingya in Hyderabad) याचा एक भाग म्हणून अनेकांना पाकिस्तानात पाठवण्यात आले आहे. मात्र, म्यानमारमधून (पूर्वीचे बर्मा) पळून आलेले रोहिंग्या आधीच हैदराबादच्या जुन्या वस्तीत तळ ठोकून असल्याचे एका व्हिडिओद्वारे उघड झाले आहे. हे रोहिंग्या म्यानमार (Myanmar, बर्मा) आणि बांगलादेशातून हैदराबादमध्ये स्थलांतरित झाल्याचे उघड झाले आहे.
(हेही वाचा – Karnataka Congress Government चे मुस्लिम लांगुलचालन; मुसलमानांचे आरक्षण आणखी वाढवणार)
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, येथे १२०० रोहिंग्या कुटुंबे राहत आहेत. तथापि, अनधिकृतपणे त्यांची संख्या ४० हजारांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी काही जणांना UNCHR (युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीस) ने अधिकृतपणे निर्वासित प्रमाणपत्रे (refugee certificates) जारी केली आहेत. यामागे स्थानिक आमदार आणि खासदारांचा पाठिंबा असल्याचे एक उघड सत्य आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी बीआरएस सत्तेत असताना, जुन्या वस्तीतील एमआयएम पक्षाच्या दबावाखाली, मतांच्या राजकारणासाठी आपल्या राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्यांकडे दुर्लक्ष केले.
రొహింగ్యా ముస్లింలు “ఖాన్ గ్రేస్”వాల్లను అడుక్కుంటున్నారు వాల్లని మీ ఇండ్లల్ల అంట పెట్టుకొని సాకండి
మా బాలాపూర్ అదేవిధంగా మిగితా చోట్ల నుండి వెంటనే తరలించండి @TelanganaCMO @revanth_anumula
లేదంటే మేమే వాల్లను తీసుకొచ్చి మీ ఇండ్లల్ల పెడ్తం
భారత్ నేషనలిస్ట్ ఫోరం 🇮🇳 pic.twitter.com/gR8xKcPAIv— 🪷🪷🚩హైందవి రెడ్డి 🚩🪷🪷BJP Parivar (@HyndaviPandem) June 6, 2025
नुकताच रोहिंग्या मुसलमानांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी मदतीची याचना केली आहे. आम्ही रोहिंग्या बर्मा येथील आहोत. आम्ही हैद्राबाद येथे रहातो. इथे ७ हजार रोहिंग्या आहेत. आमच्याकडे अनेक जण असे आहेत की, कोणाची आई, बहिण, वडील नाहीत. कोणाच्या कुटुंबात कमावणारेही कुणी नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा, असे आवाहन हा रोहिंग्यांचा नेता करत आहे.
मुख्यतः, जुन्या वस्तीतील चांदरायनगुट्टा, बालापूर, आशामाबाद, काला पत्थर, फलकनुमा, बारकास, शाहीन नगर यांसारख्या भागात ते मोठ्या संख्येने आहेत. विशेषतः आपले भारतीय कामगार जास्त पैशांमध्ये काम करतात; पण हे रोहिंग्या मात्र कितीही पैसे मिळाले, तरी काम करण्यास तयार होतात. अशा प्रकारे काम करणाऱ्यांमध्ये ‘स्लीपर सेल्स’ (sleeper cells) देखील असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रेवंथ रेड्डी सरकारही मतांच्या राजकारणासाठी एमआयएमच्या इशाऱ्यावर चालत आहे.
मुख्यतः, या रोहिंग्यांनी बर्मा देशात केलेल्या अत्याचारांमुळे तेथील बौद्ध लोकांनी त्यांना हाकलून दिले होते. ते पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमधून आपल्या देशात प्रवेश करत आहेत. येथे काही देशद्रोही लोकांमुळे त्यांना आधार कार्ड आणि मतदार कार्ड मिळत आहेत. आसाममधील तत्कालीन काँग्रेस सरकारने आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी हे रोहिंग्या असल्याचे माहीत असूनही, त्यांना आपल्या पक्षाला मते मिळतील या उद्देशाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ते हळूहळू बहुसंख्यांक हिंदू लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये येऊन सर्व प्रकारचे व्यवसाय ताब्यात घेत आहेत. एकूणच, काही पक्षांच्या कारभारांमुळे त्यांना ओळखणे कठीण होत आहे. म्हणूनच, भारत सरकारने भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे काम सुरू केले आहे. आता हैदराबादमध्ये बेकायदेशीरपणे ‘राज्य’ करणाऱ्या रोहिंग्यांना कोणत्या प्रकारे त्यांच्या देशात परत पाठवले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Rohingya in Hyderabad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community