राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे ३१ मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्या अंतर्गत सिंहगडावरील (Sinhagad) अतिक्रमणे गुरुवार, २९ मे या दिवशी सकाळी काढण्यास सुरुवात आली. ही कारवाई करण्यापूर्वी वनविभागाने घाट रस्ता आतकरवाडीचा आणि कल्याण या पायवाटेचा रस्ता पूर्णपणे बंद केला होता.
(हेही वाचा – Pune Porsche Accident प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या Dr. Ajit Taware ला आता किडनी रॅकेटमध्ये अटक)
जिल्ह्यातील (Pune) सिंहगड (Sinhagad) वगळता सर्व गडकिल्ले (Sinhagad Encroachments) अतिक्रमण मुक्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सिंहगडावर सरकारी आणि खासगी मालमत्ता देखील आहे. सरकारी जागेवर अनेक स्थानिकांनी खाद्य विक्री आणि खेळणी, लिंबू सरबत, दही विक्रीचे स्टॉल उभारले होते. यावर १९ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या नागरिकांनी एकत्रित येऊन वनविभागाच्या तात्पुरत्या संमतीने पुन्हा स्टॉल उभारले होते. तसेच गडावर खासगी मालमत्ता आहे. यातील काही जणांनी देखील अतिक्रमण केलेले निदर्शनास आले होते.
या दरम्यान, खासगी मालमत्ता धारकांचे त्यांच्या मालकीच्या संदर्भातले कागदपत्र आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेसंदर्भात पाहणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खासगी जागामालकांनी अतिक्रमण करून या ठिकाणी हॉटेल आणि घरे उभी केली होती.
ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी
ही कारवाई करण्यासाठी वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यापूर्वी कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याबाबत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलेला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि गुरुवार, २९ मे २०२५ या दिवशी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी, तसेच इतर सर्व पायी मार्गानी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community