साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ, देशात मात्र साखरेचे दर स्थिर – केंद्र सरकार

ही दरवाढ ऊसाच्या रास्त आणि लाभदायक किंमत वाढीशी सुसंगत

112
साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ, देशात मात्र साखरेचे दर स्थिर - केंद्र सरकार
साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ, देशात मात्र साखरेचे दर स्थिर - केंद्र सरकार

साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ होऊनही देशातील साखरेचे किरकोळ दर मात्र स्थिर ठेवल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. ही दरवाढ ऊसाच्या रास्त आणि लाभदायक किंमत वाढीशी सुसंगत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तर, केंद्र सरकार देशातील साखरेच्या किरकोळ किमती मात्र स्थिर ठेवण्यात यशस्वी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारचा वेळीच हस्तक्षेप, साखर क्षेत्र संकटातून बाहेर

ऑक्टोबर ते सप्टेंबर २०२२-२३ या चालू साखर हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे ४३ लाख मेट्रिक टन ऊस वापरल्यानंतरही भारतात सुमारे ३३० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या १० वर्षांत देशात साखरेच्या किमतीत २ टक्क्यांहून कमी वार्षिक दरवाढ झाली आहे. सरकारच्या व्यावहारिक धोरणात्मक हस्तक्षेपामुळे देशांतर्गत किमती थोडी दरवाढ नोंदवत स्थिर राहिल्या आहेत. सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने साखर क्षेत्र संकटातून बाहेर आले आहे.

(हेही वाचा – अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ‘या’ तारखे दरम्यान होणार, पंतप्रधानांना पाठवले आमंत्रण)

भारतात सुमारे ‘इतक्या’ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा

जुलै २०२३ च्या अखेरीस, भारतात सुमारे १०८ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा आहे. जो चालू ऊस हंगाम २०२२-२३ च्या उर्वरित महिन्यांसाठी तसेच हंगामाच्या शेवटी सुमारे ६२ लाख मेट्रिक टनच्या उद्दिष्टित साठ्यासह देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.