शाळांबाबत निर्णय कधी? काय म्हणाले अजित पवार…

79

महाराष्ट्रासह मुंबईतील शाळा १ डिसेंबरला सुरू करण्यात येतील, असा निर्णय यापूर्वी महाराष्ट्र सरकारने घेतला. पण सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शहरी शाळांबाबत सुधारित निर्णय १५ डिसेंबरपर्यंत घेण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले होते. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळांबाबत अद्याप निर्णय घेण्यात येणार नाही, योग्यवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधित विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

अद्याप निर्णय नाही

तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता शाळांबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात एकच निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असेल, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता आरोग्याला अनुसरून निर्णय घेण्यात येतील, असे सांगितले होते.

( हेही वाचा : बापरे! आता क्रिप्टोची देवाणघेवाण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होणार )

लहान मुलांना धोका अधिक

कोरोनाच्या नव्या लाटेचा सर्वात अधिक धोका लहान मुलांना असल्याने लहान मुलांच्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग वाढवण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यानुसार मुंबईच्या नायर रूग्णालयात लहान मुलांच्या लसीकरणाची नोंदणी सुरू झाली होती. आरोग्य मंत्रालय, बालरोगतज्ज्ञ यांनीही लहान मुलांनी लसीकरण करून घ्यावे, असा सूचक सल्ला दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.