Pahalgam Terrorist Attack नंतर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी

142

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम येथे हिंदू पर्यटकांच्या टार्गेट किलींगच्या (Target Killing) पार्श्वभूमीवर आज, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली. ऍड. विशाल तिवारी यांनी सदर जनहित याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यांना डोंगराळ प्रदेशात व दुर्गम ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. (Pahalgam Terrorist Attack)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack च्या कटामागील पाकिस्तानी मुल्ला जनरल आसिफ मुनीरला ठार करा; हिंदू महासभेची मागणी)

याचिकाकर्त्याने काश्मीरमधील अमरनाथ यात्रेची (Amarnath Yatra) सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली आहे. या याचिकेत पर्यटन स्थळांवर, विशेषतः दुर्गम डोंगराळ आणि दरी भागात योग्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकेल. याचिकेनुसार, उत्तर भारतीय राज्यांमधील बहुतेक राज्यांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन क्षेत्रावर अवलंबून आहे.

उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या जास्त असते. दहशतवादी हल्ल्यांमुळे या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहलगाम हल्ल्यात संवेदनशील क्षेत्र असूनही कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समोर येत आहे, असे याचिकेत म्हटले आहे. अशा ठिकाणी, दुर्गम भागात जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात, शांत वातावरण आणि निसर्गाचा आनंद घेतात अशा ठिकाणी सशस्त्र सुरक्षा असावी. अशा उपाययोजनांद्वारेच आपण पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यांपासून वाचवू शकतो, असे याचिकेत म्हटले आहे. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.