Priyanka Gandhi यांची खासदारकी संकटात; प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती अपूर्ण दिल्याचा आरोप

79

केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) वाड्रा यांना समन्स बजावले आहे. भाजपा नेत्या नव्या हरिदास (Navya Haridas) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे समन्स पाठवले आहे. हरिदास यांनी नोव्हेंबर २०२४ च्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत (Wayanad Lok Sabha by-election) प्रियांका गांधींच्या विजयाला आव्हान दिले आहे. निवडणूक लढवताना त्यांनी स्वतःच्या आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांच्या अनेक मालमत्ता आणि गुंतवणुकीची माहिती लपवल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे.

नव्य हरिदास यांचे म्हणणे आहे की, हे नियमांचे उल्लंघन आहे आणि यामुळे मतदारांची दिशाभूल झाली. हरिदास यांनी प्रियांका गांधींचा विजय रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

आता या प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट २०२५ मध्ये होईल. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी वायनाड पोटनिवडणुकीत ५ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता; पण आता त्यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.