Praveen Dixit : भारताला जशी बाह्य शक्तींकडून म्हणजेच पाकिस्तान, चीन सारख्याच अन्य काही आपत्ती, संकटांपेक्षा सर्वात जास्त भीती देशांतर्गत चालणाऱ्या गोष्टींमुळे देखील आहे, असे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित(Praveen Dixit) यांनी मांडले. ते स्पार्क अकॅडमीच्या स्पर्धा परीक्षांतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, अंतर्गत सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असून सामाजिक धोके ओळखता आले पाहिजेत. काही महत्त्वाची इन्सॉलेशन जसे की, रेल्वे, कम्युनिकेशन चॅट, प्रमुख संशोधन संस्था या सगळ्या ठिकाणांवर कुणीतरी घेराव घातल्यासारखी सध्याची स्थिती आहे. यात अनेक अपरिचित व्यक्तीदेखील असून ते रोहिंग्या, बांगलादेशी असू शकतात. त्यामुळे आपल्या या सर्व संस्थांना मोकळेपणाने श्वास घेता येईल, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आज सरकारी अधिकाऱ्यांवर आलेली आहे, असे प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) म्हणाले.
(हेही वाचा आता आयटीआयमध्ये एआय, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम; कौशल्य विकासमंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा )
स्पर्धा परीक्षांतून निवड झालेल्या परीक्षार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, शाळेपासून जर आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करू शकलो तर ते ज्या दिवशी पदवीधर होतील त्याचवेळेस प्रशासकीय सेवेस पात्र असतील. त्यांनी सांगितले की, तरुणांचा अत्यंत महत्त्वाचा पाच सहा वर्षांचा काळ तो काळ आपल्याला कसा कमी करता येईल, याचा विचार करून अॅकेडेमिक परीक्षा लागयच्या आधीच जर स्पर्धा परीक्षेचा निकाल आला तर आयुष्यातील एकही दिवस वाया जाणार नाही. त्यामुळे आजच्या तरुणांनी लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे प्रवीण दीक्षित(Praveen Dixit) यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्याच्या अमृतकाळात २०४७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारत पूर्ण विकसित करायचा आहे. विकसित करायची जबाबदारी पुढच्या २५ वर्षात आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे, असेही प्रवीण दीक्षित यांनी म्हटले. अतिक्रमण हा अतिशय अवघड प्रश्न झाला असून तो लोकशाही मार्गानेच सोडवायला पाहिजे. तसेच, ०७, ०८, ०९ मे रोजी झालेल्या युध्दजन्य परिस्थितीत भारतावर जवळपास ३ हजारांहून अधिक सायबर हल्ले झाल्याचे सांगतानाच यात सर्वाधिक हल्ले भारतातल्याच पाकिस्तान्यांना मदत करणाऱ्यांनी केले होते, असेही त्यांनी सांगितले. भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या अशा संशयित लोकांची माहिती आपण प्रत्येकाने उदासीनता सोडून प्रशासनाला दिली पाहिजे. जेव्हा आपण प्रत्येकजण सतर्क नागरिक बनू तेव्हाच भारत देश सुरक्षित होणार आहे, असेही ते म्हणाले.
सध्याच्या काळात सर्वात चर्चित असणारा मुद्दा म्हणजे फेक नरेटिव्ह, यावर बोलताना प्रवीण दीक्षित (Praveen Dixit) म्हणाले, आजघडीला सर्वात मोठा धोका म्हणजे फेक नरेटिव्ह. कुठल्यातरी लॉबीने व्हिडिओ पाठवून आपल्यावर आपल्याच शत्रूने हल्ले केले आहेत. लोकसत्ताने दिलेल्या बातमीचा दाखला देत ते म्हणाले, त्यांनी पाकिस्तान-रशिया यांच्यातील एका प्रोजेक्ट संदर्भात बातमी छापली होती. परंतु, तरुण भारत, दुरदर्शन व अन्य माध्यमांनी सांगितले की, हे खोटे वृत्त आहे. खुद्द रशियाने म्हटले की, अशा प्रकारचा कुठलाच करार झालेला नाही. त्यामुळे अमुक एक न्यूजपेपर वाचतो हे जे आपल्या मनावर फेक नॅरेटिव्ह पसरवितात त्याला नीट तोंड आपल्याला द्यावे लागेल. कम्युनिटीवरील हल्ले करण्याचा जो प्रकार आहे, हा प्रकार करण्यामागे कोण आहे हे स्पष्ट असून त्याच्या पाठीमागे पाकिस्तानची संस्था आयएसआय आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपली संस्कृती उत्तम ज्ञानाची स्त्रोत असून अगदी रामायण, भागवत, गीता असेल, ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ मुद्दाम तुमच्या वाचनात ठेवा. त्यामुळे आत्मिक बळ मिळेल तसेच, आजूबाजूला चालणाऱ्या काही धोक्याच्या परिस्थितीवरती मात करायची ताकद मिळणार आहे असे ते म्हणाले. अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्याला पुढे जाण्यासाठी लागणारे आत्मबळ आपल्याला आध्यात्मिक ग्रंथातून मिळणार आहे असे सांगतानाच अत्यंत प्रॅक्टिकल असे विस्जडम देणारा सर्वोच्च ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे, असेही त्यांनी सांगितले. सगळ्या जगात गीतेला तोड नाही ह्या ज्ञानाचा उपयोग करा, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. (Praveen Dixit)
Join Our WhatsApp Community