Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम केवळ २३ टक्केच!

पवई तलाव प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पवई तलाव आणि परिसराला भेट देऊन या उपाययोजनांची पाहणी केली होती.

103
Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम केवळ २३ टक्केच!

मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्न अंतर्गत, तलावातील जलपर्णी काढण्याचे काम ८ मार्च २०२४ पासून सुरू आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून १६ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत ५ हजार ८९५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे २९ एकर क्षेत्र जलपर्णी मुक्त झाले आहे. जलपर्णी व्याप्त क्षेत्रापैकी सुमारे २३ टक्के क्षेत्र जलपर्णी मुक्त झाले आहे. दरम्यान, या जलपर्णी काढण्यासाठी हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या वापर केला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ऍम्फिबिअस यंत्राच्या वापर केला जात नसल्याचे बोलले जात आहे. (Powai Lake)

पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त वापरांसाठी

पवई तलाव (Powai Lake) प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढून त्याला नैसर्गिक समृद्धी प्रदान करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पवई तलाव आणि परिसराला भेट देऊन या उपाययोजनांची पाहणी केली होती. पवई तलाव हा सन १८९१ मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर २२३ हेक्टर इतका आहे. जवळपास ६.६ किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टर वर पसरलेले असून तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त (non-potable) इतर प्रयोजनांसाठी उपयोगात येते. (Powai Lake)

पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम

पवई तलाव (Powai Lake) परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झालेली आहे. जलपर्णींची अनावश्यक वाढ झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकून जातो आणि पाण्याची गुणवत्ता तसेच जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे महानगरपालिकेने पवई तलाव (Powai Lake) आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची जी विविध कामे सुरू केली आहेत, त्यामध्ये तलावातील जलपर्णी काढणे आणि क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावणे, ही एक महत्त्वाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (Powai Lake)

तब्बल ९४.७२ एकरावरील जलपर्णी काढण्याची कामे सुरु

पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी काढण्याच्या कामांसाठी ७ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आला आणि लागलीच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दिनांक ८ मार्च २०२४ पासून या कामांना सुरुवात करण्यात आली. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. या कंत्राटाचा एकूण कालावधी २ वर्षांचा आहे. यामध्ये, सध्या अस्तित्वात असलेली जलपर्णी काढण्याचा कालावधी ६ महिने इतका असून त्यानंतर परिरक्षणाचा कालावधी १८ महिने म्हणजे दीड वर्ष इतका समाविष्ट आहे. तलावाच्या ५५७.५० एकर जलव्याप्त क्षेत्रापैकी जलपर्णी व्याप्त क्षेत्र हे सुमारे १२३.९७ एकर इतके होते. त्यापैकी आत्तापर्यंत २९.२५ एकर क्षेत्रावरून जलपर्णी काढण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे २३.५९ टक्केक्षे त्र जलपर्णी मुक्त झाले आहे. उर्वरित क्षेत्र ९४.७२ एकरावरील जलपर्णी काढण्याची कामेही वेगाने केली जात आहे. (Powai Lake)

जलपर्णी काढण्यासाठी ११.१८ कोटींचा खर्च

कंत्राटदाराला दिलेल्या कार्यादेशाप्रमाणे एकूण सुमारे २४ हजार ९८५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटवणे अपेक्षित आहे. त्यापैकी, १६ एप्रिल २०२४ पर्यंत सुमारे ५ हजार ८९५ मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढून क्षेपण भूमीवर वाहून नेण्यात आली आहे. याचाच अर्थ आणखी १९ हजार ०९० मेट्रिक टन जलपर्णी सध्याच्या कंत्राटदाराकडून काढली जाणे अपेक्षित आहे. यासाठी  महापालिकेने एस.के.डेव्हलपर्स या कंपनीची निवड केली असून यासाठी विविध करांसह ११.१८ कोटी  रुपये खर्च केले जाणार आहेत. यापूर्वी सन २०२१मध्ये अशाचप्रकारे जलपर्णी काढण्यासाठी बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड केली होती. या कंपनीला जलपर्णी काढण्यासाठी विविध करांसह ११.२५ कोटी  रुपये खर्च केले होते. (Powai Lake)

(हेही वाचा – Swimmer : कल्याणमधील १० विद्यार्थ्यांनी श्रीलंका ते भारत १२ तासांत पोहून पार केले ३० किमी अंतर)

सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याची कार्यवाही

दरम्यान, पवई तलावाचे नैसर्गिक संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. ही बाब लक्षात घेवून, पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक उपाययोजना करण्यात येत आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या मलनिसारण प्रकल्प खात्याच्या वतीने नुकतीच पाहणी करण्यात आली आणि त्यानुसार कामे हाती घेण्यात येत आहेत. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. (Powai Lake)

पाण्यात प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी

तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी तरंगते कारंजे व्यवस्था यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तलावातील जैवविविधता आणि जलचरांच्या हिताच्या दृष्टीने पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी देखील Aeration and Dissolved Oxygen (DO) Monitoring System पवई तलावाच्या ठिकाणी नुकतीच उभारण्यात आली आहे. त्यातून सातत्याने प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जात आहे. (Powai Lake)

म्हणून तलावातील पाणी प्रदूषित

सांडपाण्याच्या प्रवाहामुळे तलावातील पाणी प्रदूषित झाले, ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था (Maharashtra Engineering Research Institute) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहकार्याने पवई तलावातील गाळ विषयक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर विश्लेषण करून भविष्यात पुढील कार्यवाहीची दिशा ठरवण्यात येणार आहे. (Powai Lake)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.