Mahatma Phule Scheme : महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांना केवळ प्रतीक्षा

योजना अमलात येत नसल्याने रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण

68
Mahatma Phule Scheme : महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांना केवळ प्रतीक्षा
Mahatma Phule Scheme : महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांना केवळ प्रतीक्षा
राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात घोषणा केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या उपचारासाठी पाच लाख विम्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्यापही ही योजना अमलात येत नसल्याने रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन महिने होऊनही पाच लाख विमा उपलब्ध होत नसल्याने रुग्ण उपचारापासून वंचित राहत असल्याची तक्रार रुग्णांनी केली. प्रत्येक पालिका आणि सरकारी रुग्णालयात दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते उपलब्ध असतात. शिवाय सरकारी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भात बरेचदा डॉक्टर्स माहिती देतात.

मात्र दोन महिने उलटले तरीही रुग्णांना पाच लाखांचा विमा कवच उपलब्ध झालेला नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतीत निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. संपूर्ण प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पाच लाखांच्या नव्या योजनेत आजारांची संख्यादेखील वाढली आहे. योजना तर सर्वांनाच लागू केली आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियमही बदलला आहे. नवीन इन्शुरन्स कंपनी शोधून त्यांना सध्याच्या नवीन योजनेतील लाभार्थींची संख्या आणि कवच याची माहिती देऊन प्रीमियम द्यावा लागेल.

(हेही वाचा-Shravan Special : भगवान शंकराने घेतले ‘हे’ दिव्य अवतार, वाचा अलौकिक महत्त्व)

पाच लाखांच्या नव्या विमा कवच बद्दल
सार्वजनिक आरोग्य विभागाने 27 जुलै रोजी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अडीच लाखां होईल थेट पाच लाखांवर वाढवत असल्याचे घोषित केले. या योजनेअंतर्गत राज्यातील एक हजार रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहे. यात सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचाही समावेश आहे. आजारांची संख्या 996 वरून 1 हजार 356 वर करण्यात आली आहे.

राज्यातील अधिवास प्रमाणपत्र धारकांना ही योजना लागू होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या योजनेत राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबा मागे 855 रुपये दिले जातात. वर्षभरासाठी या कंपनीला राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वतीने 1 हजार 770 कोटी रुपये दिले जातात. राज्यभरातील 2 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना या विमा योजनेचा फायदा झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.