Patanjali Ayurved : पतंजली आयुर्वेद(Patanjali Ayurved) लिमिटेड व संस्थापक बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पतंजली आयुर्वेद(Patanjali Ayurved) लिमिटेड व संस्थापक सदस्यांविरोधात दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला. शनिवार, १५ जूनला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय दिला असून औषध व जादूई उपाय(आक्षेपार्ह जाहिराती) प्रतिबंधक कायदा, १९५४ च्या कलम ३, ४ व ७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.(Patanjali Ayurved)
महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले की, तक्रारीत खोटे दावे असल्याचे कोणतेही स्पष्ट वर्णन नाही. जाहिरातीत नेमका कोणता मजकूर दिशाभूल करणारा होता याचे तपशील दिलेले नाहीत. तसेच जाहिरात खोटी आहे हे दर्शवणारा तज्ज्ञांचा अहवालही नाही, असे न्यायमूर्ती विवेक भारती शर्मा यांनी म्हटले. दरम्यान, या प्रकरणी उत्तराखंडचे वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी यांनी २०२४ मध्ये दाखल तक्रार केली होती. पतंजली(Patanjali Ayurved) निर्मित काही औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला होता. यात मधुग्रित, मधुनाशिनी, दिव्य लिपिडोम, लिवमृत अॅडव्हान्स यांसह अन्य काही औषधांचा समावेश होता.
पतंजली आयुर्वेद(Patanjali Ayurved), बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ५८२ अंतर्गत हरिद्वार न्यायालयाच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या मते खटला चालवण्यासारखा कोणताही ठोस आधार तक्रारीत दिसत नाही. ट्रायल कोर्टाने दिलेला समन्स “न्यायिक मनाचा वापर न करता” दिला होता, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, ट्रायल कोर्टाचा समन्स आदेशही न्यायालयाने अवैध ठरविला. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाचा हवाला देऊन खटल्याचे मूल्यांकन करता येत नाही. ते आरोपांवरील पुराव्यावरच आधारित असावे. त्यामुळे पतंजली(Patanjali Ayurved)विरोधातील तक्रार फेटाळण्यात आली असून समन्स रद्द करण्यात आल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.(Patanjali Ayurved)
Join Our WhatsApp Community