
-
प्रतिनिधी
वारकऱ्यांचा कैवारी असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने दिंड्या निघतात. राज्य सरकारने त्यानुसार ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
यंदा ६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांच्या सोयीसुविधेसाठी राज्य सरकारने यंदा जोरदार तयारी सुरू आहे. ६ जुलैला आषाढी वारी असून त्याआधीच अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. हाती टाळ, खांद्यावर भगवी पताका, मुखी हरीनामाचा गजर जयघोष लाखो वारकरी पंढरीला जातात. यंदा वारकरी वर्गाला खूष करण्यासाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानाच्या पालख्यासोबत वारीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला अर्थसहाय्य देण्यास कौल दिला होता. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुमारे १० पालख्यांसोबत ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. यंदा २ कोटी २१ लाख ८० हजार रूपयांचे अनुदान मंजूर केले आहेत. आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (Pandharpur Ashadhi Wari)
(हेही वाचा – Heavy Rainfall Forecast : आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क)
मुक्कामाच्या ठिकाणी उत्तम व्यवस्था
पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा. डोंगराच्या बाजूने खोदाई सुरू असल्याने पावसाने दगड रस्त्यावर येऊन वारकऱ्यांना धोका होऊ उत्पन्न होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. (Pandharpur Ashadhi Wari)
आषाढीसाठी ५ हजार बसेस
आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. (Pandharpur Ashadhi Wari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community