Pakistan Army : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानविरुद्ध इतर अनेक मोठी पावले उचलली. याबद्दल शेजारच्या देशात भीतीचे वातावरण आहे आणि लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. लोक देश सोडून पळून जाऊ लागले आहेत. अशातच भारतीय लष्करी कारवाईला पाक सैन्य घाबरले असून, अनेक सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. (Pakistan Army)
🚨 #BREAKING:
Internal dissent explodes — Pakistan Army witnesses mass resignations as confidence in Asim Munir weakens. pic.twitter.com/4IRYCTvhqv
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) April 28, 2025
पहलगाम येथील घटनेनंतर जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि मोठ्या प्रमाणावर राजीनाम्याच्या विनंत्या येत आहेत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या जनरल हेडक्वार्टर (GHQ) रावळपिंडी येथून जारी करण्यात आलेल्या गोपनीय सल्लागार (सल्लागार क्रमांक: ISPR/OPS/2025/04/028) यातून देण्यात आली आहे. मेजर जनरल फैसल महमूद मलिक, HI(M), DG ISPR यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून संभाव्य कठोर कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तराच्या भीतीने सुमारे 1200 पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र सुरू आहे. पाक लष्कराचे मनोबल सातत्याने घसरत आहे. भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये चिंतेची लाट निर्माण झाली आहे, असे सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे. भारताने सीमेवर अलर्ट जारी केला असून, सुरक्षा वाढवली आहे. दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची तयारी भारताने केली आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack च्या वृत्तांकनावर आक्षेप; केंद्र सरकार बीबीसीवर लक्ष ठेवणार)
तसेच राजीनामा देणाऱ्या किंवा परवानगीशिवाय सैन्यदल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये ‘पाकिस्तान आर्मी अॅक्ट, 1952’ अंतर्गत कठोर शिक्षा दिली जाईल, असे बजावले आहे. या परिपत्रकाच्या अखेरीस, सैनिकांना शहीदांच्या वारशाचे वारसदार असल्याचे सांगून एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी चिन्हाखाली एकजूट राहण्याचा संदेश सर्वांना देण्यात आला आहे. मेजर जनरल फैसल महमूद मलिक यांच्या स्वाक्षरीने आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देऊन या परिपत्रक समाप्त होते. लष्कराच्या उच्च पदस्थांना परिस्थितीचे संपूर्ण गांभीर्य आहे आणि ते सैनिकांमध्ये पसरलेल्या असंतोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी करत आहेत, असे दिसून येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community