जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २.४५ वाजता बैसारन व्हॅली परिसरात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदीचे नाव विचारले आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर त्यांनी इतर लोकांवर गोळीबार केला आणि तेथून पळून गेले. लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (Pahalgam Terrorist Attack)
पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वी अमरावतीमधील पर्यटक काही मिनिटे आधीच तिथून निघाल्याने बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही वेळेआधीच निघाल्याने अमरावती येथील 11 पर्यटक हे दहशतवादी हल्ल्यातून बचावले आहे. सध्या हे सर्वजण श्रीनगरमधील ‘हॉटेल डेव्हलिप लँड’ येथे सुरक्षित आहेत. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack नंतर मुंबईत हाय अलर्ट ; पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश
या पर्यटकांमध्ये मंगला बोडके यांचा परिवार, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचे कुटुंबीय सहभागी आहेत. ते सर्वजण एकत्रितपणे पर्यटनासाठी पहलगामला गेले होते. पहलगाममध्ये या पर्यटकांनी निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतला. त्या ठिकाणी मनसोक्त फोटो काढले, व्हिडीओ काढले, रील्सही बनवले. पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर अमरावतीमधील या पर्यटक तिथून निघाले. त्यानंतर काही वेळेत दहशतवादी हल्ला झाला. (Pahalgam Terrorist Attack)
हेही वाचा- Pahalgam Terrorist Attack : पहलगाममध्ये दहशतवाद्यांना लोकल सपोर्ट ! नेमकं काय घडलं?
या दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच अमरावतीत त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता पसरली होती. मात्र श्रीनगरमधून मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली. (Pahalgam Terrorist Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community