Pahalgam Terror Attack नंतर काश्मीरच्या पर्यटनाला गतवैभव; अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी खुली

Pahalgam Terror Attack नंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे.

60

Pahalgam Terror Attack नंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर राज्यातील अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे. दरम्यान, २२ एप्रिलला झालेला बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर राज्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता नायब राज्यपालांच्या निर्णयानंतर बंद करण्यात आलेली अनेक पर्यटनस्थळे व उद्याने पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहेत.(Pahalgam Terror Attack)

(हेही वाचा Iran – Israel Conflict : इराण – इस्त्रायल संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; भारतावर काय परिणाम? )

दरम्यान, नायब राज्यपालांच्या निर्णयाचे स्थानिक नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर बंद राहिलेल्या विविध पर्यटनस्थळांवर आता गर्दी जमू लागली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, यावेळी उद्यानांच्या सभोवताली मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. २२ एप्रिल रोजी बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर बंद करण्यात आलेले पहलगामसह जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन स्थळांमधील अनेक उद्याने मंगळवार, १७ जूनला पुन्हा उघडण्यात आली आहेत.

(हेही वाचा G-7 Summit : कॅनडासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची मोठी संधी; जी-७ मधील राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार )

पहलगाममधील बेताब व्हॅली व पहलगाम बाजाराजवळील उद्याने, अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग, कोकरनाग, अछाबल उद्याने, बदामवारी पार्क, निगीनजवळील डक पार्क तसेच श्रीनगरमधील हजरतबलजवळील तकदीर पार्क पर्यटक व स्थानिकांनी गर्दीने भरलेले होते. विशेषतः दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमधील प्रसिद्ध उद्यान वेरीनाग येथे मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी पर्यटकांचे स्वागत केल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानिक नेते रफी अहमद मीर यांचं नायब राज्यपालांना निवेदन

जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे रफी अहमद मीर यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना निवेदन दिले आहे. रफी अहमद मीर यांनी निवेदनात म्हटले की, काही बंद पर्यटन स्थळे, विशेषतः पहलगाममधील बेताब व्हॅली पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. या निर्णयामुळे केवळ जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला पुनरुज्जीवित करण्यात आले नाही तर या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या स्थानिकांना नवीन आशा, उपजीविका मिळाली आहे. ते पुढे म्हणाले, अरु व्हॅली पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी नायब राज्यपालांना केली.(Pahalgam Terror Attack)

nbsp;

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.