
-
प्रतिनिधी
राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये क्रांतिकारक बदल! येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी यासारखे अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्यभरातील १,०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सहा नवे तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
“तरुणांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न” – लोढा
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले, “राज्यातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जागतिक स्पर्धेत उतरवायचे असेल, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये काळाबरोबर बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयटीआयमध्ये पुढील अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत” :
सौरऊर्जा तंत्रज्ञ, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञ, ड्रोन तंत्रज्ञ, थ्रीडी प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), इंडस्ट्रियल रोबोटिक्स या कोर्सेसचा कालावधी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत असणार आहे. हे अभ्यासक्रम तरुणांना उच्च पातळीवरील नोकरी व उद्योजकतेकडे घेऊन जाणारे ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – Justice Yashwant Verma : न्यायमूर्ती वर्मांच्या अडचणीत वाढ होणार; केंद्र सरकार महाभियोग प्रस्ताव संसदेत मांडण्याच्या तयारीत)
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रेरणादायी व्याख्यानमाला
६ जून – शिवराज्याभिषेक दिन देशातील तरुणांमध्ये सामाजिक जाणीव, देशभक्ती व कर्तव्यभावना जागवण्यासाठी एक विशेष प्रसंग असतो. या दिवशी राज्यभरातील सर्व १,०९७ आयटीआयमध्ये एकाच वेळी विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सकाळी १० वाजता होणार आहे. व्याख्यानमालेचे विषय पुढीलप्रमाणे असणार आहेत. नागरिकांची कर्तव्ये व सामाजिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारधारा आणि संकल्पना, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण या सर्व विषयांवर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कौशल्यविकास विभागाचा भविष्यदृष्टीपूर्ण उपक्रम
मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले की, “केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही. आपल्या तरुणांना नव्या युगातील तंत्रज्ञानाची साथ मिळाली पाहिजे. हा उपक्रम महाराष्ट्रातील शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल.” आता आयटीआय म्हणजे केवळ वेल्डिंग, इलेक्ट्रिशियनपुरते मर्यादित न राहता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, आणि ड्रोनसारख्या भविष्यकालीन क्षेत्रात राज्यातील तरुणांना घडवण्याचे सरकारचे मोठे पाऊल असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र आता “स्किल्सची राजधानी” बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community