नवीन पनवेलच्या नागरिकांना सतावतेय Kundamala Bridge Collapse सारखी दुर्घटना घडण्याची भीती

Kundamala Bridge Collapse : देवद गावातील रहिवासी गाढी नदी पार करून जाण्यासाठी चक्क पाण्याच्या पाइपलाईनच्या देखभालीसाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून ये-जा करत आहेत.

190

मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. (Kundamala Bridge Collapse) त्यात अनेक पर्यटक वाहून गेले आणि काही मृत्युमुखी पडले. हा पूल धोकादायक असल्याची प्रशासनाला कल्पना होती. (Pune Bridge Collapse) असे असूनही प्रशासनाने येथील वाहतूक थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, त्यामुळे ही दुर्घटना घडली. अशाच प्रकारे धोकादायक झालेल्या पुलावरून देवद, नवीन पनवेल (New Panvel) येथील नागरिकही ये-जा करत आहेत. त्यामुळे येथेही कुंडमळासारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती देवद, विचुंबे, सुकापूर भागातील नागरिकांना सतावत आहे.

(हेही वाचा – https://www.marathi.hindusthanpost.com/social/mismanagement-of-cidco-in-panvel-the-bridge-was-partially-closed-inconvenience-of-citizens-continues-ok-ok/#google_vignette)

पाइपलाईनच्या देखभालीसाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून नागरिक करतात ये-जा

नवीन पनवेल येथील देवद आणि विचुंबे या गावांमध्ये लोकसंख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. आता या दोन्ही गावांत बऱ्याच इमारती उभ्या राहिल्या आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे. देवद गावातील रहिवासी गाढी नदी पार करून जाण्यासाठी चक्क पाण्याच्या पाइपलाईनच्या देखभालीसाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून ये-जा करत असतात. विशेष म्हणजे या पुलावरून वर्दळ करण्यास नियमानुसार परवानगी नाही, तरीही नाईलाजास्तव रहिवासी बाजारहाट करण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, नोकरीसाठी रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरता या पुलाचा वापर करतात. या पुलावरूनच रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनेही ये-जा करतात. हे धोकादायक असूनही रहिवासी नाईलाजाने जीव धोक्यात घालून या पुलाचा वापर करतात.

आता तर हा पूलही धोकादायक बनला असल्याने या पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील रहिवाशांची गैरसोय वाढत आहे.

वाढती लोकसंख्या लक्षात घेता या दोन्ही गावांसाठी नवीन पूल बांधण्याची मागणी होत होती. त्यानुसार CIDCO ने दोन पूल बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याप्रमाणे पूल बांधण्याचे काम सुरूही केले. त्यानुसार गाढी नदीवर पूल बांधलाही, मात्र तो आता अर्धवटच राहिला आहे. हा पूल रेल्वे स्थानकाच्या दिशेने म्हणजेच सुकापूरच्या दिशेने जोडलेला आहे; परंतु देवद गावाच्या दिशेने जोडलेलाच नाही. त्यामुळे हा पूल पूर्णच होऊ शकता नाही. CIDCO ने ११ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला आहे. तरीही या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. या पूलाला आताच तडे गेले आहेत.

दररोज २०,००० हून अधिक नागरिक एक अतिशय अरुंद पाइपलाईन पूल वापरत आहेत, जो वाहनांसाठी बांधलेला नाही. ही परिस्थिती अतिशय धोकादायक आहे आणि कुठल्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो. कुंडमाळा येथे जे घडले, तसेच अपघात येथेही होऊ शकतो. आम्ही यापूर्वी अनेक वेळा संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे, पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी खंत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.