-
प्रतिनिधी
राज्य सरकारच्या अश्लीलतेविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी परिसरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर पोलिसांनी काल रात्री मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत ४० महिलांची सुटका करण्यात आली असून ४६ जणांविरुद्ध विविध गंभीर आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्पष्ट निर्देशानुसार व तातडीच्या कृतीतून करण्यात आली. राज्य सरकारने अश्लीलतेवर कठोर प्रतिबंध घालण्याचे धोरण स्वीकारले असून, त्याचा भाग म्हणून ही मोहीम राबवली जात आहे.
(हेही वाचा – पावसातही भक्तीचा उत्सव अखंड; वारी यशस्वी करण्यासाठी CM Devendra Fadnavis यांचे काटेकोर नियोजनाचे आदेश)
काय घडले कारवाई दरम्यान?
पोलिसांनी (Navi Mumbai) रात्री उशिरा ‘द रेस’ या बारवर छापा टाकला असता, तेथे म्युझिक सिस्टीमच्या कर्णकर्कश्श आवाजात काही महिला अत्यंत अश्लील पोशाखात ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. बारमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही तो रात्री १२ नंतरही सुरू होता. या छाप्यात बारमधील ६ वेटर्ससह बार मालक, व्यवस्थापक आणि इतर संबंधितांविरोधात विविध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये अनधिकृत व्यवसाय, अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणे, महिलांच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे वर्तन यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Artificial Intelligence : ‘एआय’ सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस प्रवाशांच्या सेवेत येणार)
सरकारची भूमिका ठाम, मोहिमेचा पाठपुरावा ठोस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील नैतिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अनैतिक कृत्यांवर आळा बसावा म्हणून ठाम भूमिका घेतली असून याच भूमिकेमुळे अशा बेकायदेशीर डान्स बारवर धडक कारवाई शक्य झाली आहे.
(हेही वाचा – Civil Defence Mock Drill: भारताच्या ‘या’ सीमावर्ती भागात गुरुवारी होणार मॉकड्रिल)
राज्य शासनाची मोहिम थांबणार नाही
ही कारवाई म्हणजे सुरुवात असून, अशा प्रकारच्या अनधिकृत, अनैतिक व्यवसायावर राज्यभरात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. अश्लीलतेविरोधातील ही मोहीम समाजाच्या नैतिक आरोग्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी अत्यंत महत्त्वाची असून, सरकार या दिशेने ठोस पावले उचलत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community