Nana Shankarsheth यांच्या स्मारकाची उपेक्षाच, बारा वर्षे झाली तरी रचली जात नाही विट

159

मुंबईच्या विकासासाठी ज्यांनी शेकडो जमिनी दान केल्या असे महापुरुष, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ नाना शंकरशेठ यांच्या मुंबईतील स्मारकासाठी वडाळा येथे जागा तर मिळाली. परंतु, त्यांच्या बांधकामाची विट तब्बल १२ वर्षे उलटत आली तरी रचली गेलेली नाही. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी व्यावसायातून मिळवलेला पैस नानांनी मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी खर्च केला नाही तर आपल्या दूरदृष्टीने मुंबईत अनेक प्रकल्प आणले. तसेच नाना शंकरशेठ यांच्या योगदानातून भारतातील पहिली रेल्वे धावली (India’s first train) आणि तीही मुंबईत.  परंतु आता त्याच नाना शंकर शेठ यांचे मुंबईत स्मारक (Nana Shankar Sheth Memorial) उभारण्यासाठी सरकारने महापालिकेवर खर्च करण्याची जबाबदारी सोपवली असली तरी प्रत्यक्षात महापालिकेकडून या स्मारकाच्या बांधकामाला मात्र गती दिली जात नसल्याने या स्मारकाच्या नावाखाली एकप्रकारे त्यांची उपेक्षाच होत असल्याचे दिसून येत आहे. (Nana Shankarsheth)

(हेही वाचा – ‘लाज वाटली पाहिजे!’ म्हणत Bombay High Court राज्य सरकारवर संतापलं; नेमकं काय प्रकरण ? वाचा…)

समाज सुधारक नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वडाळा येथे १५०० चौरस मीटरची जागा मंजूर करण्यात आली. सुरुवातीला या भूखंडासाठी महापालिकेकडून १ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. परंतु, महापालिका सभागृहांमध्ये हा भूखंड देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करताना एक रुपया नाममात्र दराने देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाना शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी एक रुपया दराने सन २०१४मध्ये भूखंड प्राप्त झाला. परंतु त्यानंतर  आलेली आर्थिक मंदीची लाट, नोटबंदी आणि त्यानंतर कोविडची लाट यामुळे नानांचे स्मारकाबाबत कोणतीच हालचाल होवू शकली नाही. त्यामुळे या स्मारकाच्या विश्वस्त न्यास मंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. तत्कालिन नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. तसेच तत्कालिन शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याकडेही  याबाबत निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी या स्मारकासाठी लागणारा ३५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेने (BMC) द्यावा अशाप्रकारचा निर्णय घेत निर्देश दिले.

निधी देण्याचे निर्देश महापालिकेला दिल्यानंतर मागील ऑक्टोबर २०२४मध्ये या स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले. तसेच यासाठीचा कंत्राटदाराही नियुक्त करण्यात आल्याने  यासाठी सहा माळ्याची इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. परंतु आता जून महिना लोटला तरी या स्मारकाची विटही रचली गेलेली नसून उलट महापालिका प्रशासनाकडून या बांधकामामध्येच हक्क मागितला जात असल्याची माहिती मिळत आहे. सहा मजली इमारतीच्या बांधकामांतील दोन मजलेच स्मारकासाठी देवून उर्वरीत जागा महापालिका प्रशासन स्वत:कडे ठेवू पाहत असल्याची माहिती मिळत आहे. एका बाजुला संस्थेने महापालिकेने भूखंड दिल्यानंतर राज्य सरकारकडे स्मारक उभारणीच्या निधीची मागणी केलेली असताना सरकारने ही जबाबदारी महापालिकेवर सोपवली. जर महापालिकेला हा निधी देणे किंवा यावर खर्च करणे शक्य नव्हते तर त्याच वेळी महापालिकेने सरकारला का कळवले नाही असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने मोफतमध्ये भूखंड उपलब्ध करून दिला आणि त्यासाठी निधीही महापालिकेने द्यावा अशाप्रकारची जर प्रशासनाची असेल तर हेच सरकारला सांगण्याची हिंमत प्रशासनाची का नाही असा सवाल उपस्थित होत आहे. मागील काही महिन्यांपासून स्मारकाच्या विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी महापालिका इमारतीत फेऱ्या मारत असून याबाबत ठोस निर्णय न झाल्याने तब्बल १२ वर्षांनंतरही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याने ते  चिंतेत आहेत.

(हेही वाचा – Water Metro : मुंबईत वाहतूक क्रांती, लवकरच अडीच हजार कोटींचा प्रकल्प राबविणार; कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा)

ज्या नानांनी आपल्या हयातीत जमिनीच्या जमिनी दान केल्या, मुंबईनानांची स्मारकाच्या नावाने उपेक्षा होत असल्याने महापालिका प्रशासन आणि सरकारच्या वादात किती दिवस या स्मारकाचे बांधकाम अडकून पडणार आहे असा सवाल मुंबईकरांना पडू लागला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.