Mumbra Train Accident : ‘धीम्या मार्गावर जलद लोकल…’; रेल्वे दुर्घटनेचे खरे कारण आले समोर?

240
Mumbra Train Accident : 'धीम्या मार्गावर जलद लोकल...'; रेल्वे दुर्घटनेचे खरे कारण आले समोर?
  • प्रतिनिधी 

दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर मुंब्रा मधील अपघाताचे ठिकाण वादाच्या भोवऱ्यात आले आहे आहे. जेव्हापासून जलद गतीच्या लोकल ट्रेन या मार्गावर वळविण्यात आल्या तेव्हा पासून हे वळण रेल्वे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. या मार्गावर पूर्वी धीम्या गतीच्या ट्रेन धावत होत्या मुंब्रा स्थानक येण्यापूर्वी किंवा मुंब्रा स्थानकातून कल्याणच्या दिशेने जाताना या ट्रेनची गती कमी असल्यामुळे अपघाताचे प्रमाण आणि धोका कमी होता अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. (Mumbra Train Accident)

मुंब्रा आणि दिवा स्थानकाजवळ असलेल्या तीव्र वळणावर सोमवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेत ५ जणांना आपले प्राण गमावावे लागले तर ७ जण जखमी झाले आहे. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, जेव्हा पासून जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्यामुळे मुंब्रा जवळील हे वळण अधिक धोकादायक बनले आहे. जलद लोकलला मुंब्रा येथे थांबा नसल्यामुळे जलद लोकल ट्रेनचा वेग अधिक असतो. मात्र यापूर्वी या मार्गावरून धीम्या ट्रेन जातांना मुंब्रा स्थानक येण्यापूर्वी किंवा मुंब्रा येथून कल्याणच्या दिशेने जात असताना ट्रेनची गती कमी असल्यामुळे हे तीव्र वळण पूर्वी धीम्या गतीच्या ट्रेनसाठी धोकादायक नव्हते. (Mumbra Train Accident)

(हेही वाचा – ‘पाकिस्तानात दहशतवादी जितके आत असतील तितके आत घुसू’; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)

जलद लोकल ट्रेनला मुंब्रा स्थानकात थांबा नसल्यामुळे तीव्र वळणावर देखील ट्रेनला गती जास्त असल्यामुळे लोकल ट्रेन झुकते त्यात दुसऱ्या बाजूने येणाऱ्या जलद ट्रेनला गती असल्यामुळे दोन्ही ट्रेन मधील अंतर कमी होत असल्यामुळे या वळण धोकादायक बनत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर मान्य केले आहे. भीषण अपघाताने मुंबईच्या उपनगरीय प्रवासात गर्दीने भरलेल्या गाड्या, कमी झालेल्या नॉन-एसी सेवा आणि धोकादायक पायाभूत सुविधांचे भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. (Mumbra Train Accident)

प्रवासी प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वे व्यवस्थापनाच्या कमकुवत व्यवस्थापनावर बोट ठेवले आहे, तर सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) आकडेवारीनुसार, विशेषत ठाणे-डोंबिवली मार्गावर गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे चिंताजनक प्रमाण दिसून येते.२०२४ च्या सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ठाणे आणि डोंबिवली क्षेत्रात चालत्या गाड्यांमधून पडून १०७ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक जखमी झाले. मध्य रेल्वेच्या इतर उपनगरीय विभागांच्या तुलनेत ठाणे-डोंबिवली मार्गावर अशा घटनांमुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. दिवा ते सीएसएमटी थेट लोकल ट्रेन नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे, असे प्रवाशांचे प्रतिनिधी अमोल धनराज केंद्रे यांनी अधोरेखित केले. दिवा परिसरातील लोकसंख्या वाढत असल्याने, सीएसएमटीला जाणाऱ्या सकाळच्या गाड्यांमध्ये असह्य गर्दी झाली आहे. (Mumbra Train Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.