
मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी कसाऱ्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलमधील प्रचंड गर्दीला कारणीभूत ठरवत, सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Mumbra Train Accident)
(हेही वाचा – 11 years of Modi Government : मोदी सरकारची ११ वर्षे : भारताच्या प्रगतीची अभूतपूर्व गाथा)
आज आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “कालची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मेट्रोचे जाळे अद्याप मर्यादित असल्याने लोकल ट्रेनवरच प्रवाशांचा अधिक भार आहे. त्यामुळे अशा दुर्घटना होण्याची शक्यता वाढते.” मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्र सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चा उघड करत सांगितले की, “एसी लोकल ट्रेनची संख्या वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. दरवाजे बंद करण्याच्या पर्यायासोबतच योग्य व्हेंटिलेशनसाठीही उपाययोजना शोधली जात आहे.” (Mumbra Train Accident)
(हेही वाचा – कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनी लॅबमधील संशोधकाला FBI ने केली अटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड)
लोकलमधील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलत फडणवीस यांनी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. “खाजगी कंपन्यांसाठी वेळेत बदल करणे सध्या कठीण आहे, कारण त्याचा थेट परिणाम त्यांच्या नफा-तोट्यावर होतो. मात्र भविष्यात त्यासाठीही उपाय शोधले जातील,” असेही त्यांनी नमूद केले. मुंब्रा दुर्घटनेमुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकारकडून पुढील काळात लोकलसेवेत सुधारणा, प्रवासी सुरक्षेसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत. (Mumbra Train Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community