-
प्रतिनिधी
मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांच्या (Bangladeshi Infiltrators) घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांना त्यांच्या मुलुखात पाठविण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. मुंबईत घुसखोर बांगलादेशी विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, आणि मुंबईला घुसखोर बांगलादेशी नागरिकांपासून मुक्त करू असे मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त देवेन भारती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack ची टूलकिट सापडली; काय होती त्यात माहिती? जाणून घ्या… )
मुंबई पोलीस दलाचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांनी बुधवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, शासनाने माझ्यावर टाकलेली ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल. मुंबईकरांसाठी शक्य आहे ते सगळं करणार, शेवटच्या स्तरापर्यंत पोलीस पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या ज्या योजना आहेत, त्या शेवटच्या स्तरा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन.
(हेही वाचा – Shivaji Park परिसराची पारंपारिक पद्धतीने स्वच्छता; यांत्रिक झाडूने का केली जात नाही झाडलोट?)
तसेच मुंबईतील घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) नागरिकांबाबत बोलताना देवेन भारती म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करीत आली आहे. ही कारवाई या पुढे तीव्र करण्यात येईल. मुंबईत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या मुलुखात पाठविण्यात येईल मुंबईला बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पासून मुक्त करू असे मुंबईचे नवनिर्वाचीत पोलीस आयुक्त देवेन भारती म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community