मुंब्रा-दिवा स्टेशन (Mumbra-Diva Station) दरम्यान लोकलमधून पडून हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. त्याला बाहेर लटकलेले ८ लोक पडले. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Train Accident)
हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Pakistan पुन्हा उघडा पडला; सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड करत, ‘हा’ दावा केला)
१. पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत (Automatic Door Closer) असतील. २३८ एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.
२. दुसरा निर्णय असा आहे की, आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहोत, असा निर्णय आता घेतला आहे.
३. मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून (Kalyan to Kasara) तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. (Mumbai)
४. दादरपासून किंवा दिव्यापर्यंत सीएसएमटीपर्यंत पाचव्या सहाव्या लाईनचे प्लानिंग केले आहे. ही प्लानिंग कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यापुढे जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच १५ डब्ब्यांच्या गाड्या वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.
५. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपण सिग्नल सिस्टिम अपडेट केली आहे. पायाभूत सुविधाही आपण अपग्रेड केल्या जाणार आहेत.
६. पायाभूत सुविधा अपडेट केल्यावर लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे. (Mumbai Train Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community