-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील सर्वांत पाणी साचण्याचे प्रमुख ठिकाण समजले जाणारे हिंदमाता येथील परिसरात यापुढे पाणी साचणार नाही असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी पहिल्याच हे दावे फोल ठरले गेले आहेत. ब्रिटानिया आऊट फॉलचे पंपिंग स्टेशन, त्यानंतर याठिकाणी नव्याने टाकण्यात आलेली पर्जन्य जलवाहिनी, येथील साचलेले पाणी पंपिंग करुन साठवण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान आणि झेवियर्स स्कूल परिसरातील पाण्याची टाकीची उभारणी तसेच पुलाची उंची वाढवण्यासह पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवलेले अतिरिक्त पंप असा सर्व खटाटोप करून यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही पहिल्याच पावसात याठिकाणी पाणी भरले असेल तर पुढील पावसाळ्यात काय स्थिती असेल असा प्रश्न आता मुंबईकरांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. (Mumbai Rain)
(हेही वाचा – Jyoti Malhotra च्या अडचणीत वाढ; पाकमध्ये AK 47 बंदूक घेतलेल्या सुरक्षारक्षकांसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल)
दादर पूर्व येथील हिंदमाता सिनेमा परिसरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबले जात असल्याने यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून ब्रिटानिया आऊट फॉल येथे पंपिग स्टेशन बनवण्यात आले. तब्बल १ १५ कोटी रुपये खर्च करून हे पंपिंग स्टेशन बनवून सन २०१६ मध्ये ते कार्यान्वित केले. या पंपिंग स्टेशनमध्ये ६ पंप असून प्रति सेकंदाला ३६ हजार लिटर पाणी बाहेर फेकण्याची क्षमता आहे. या पंपिंग स्टेशनमुळे लालबाग, हिंदमाता, काळाचौकी, भायखळा, रे रोड येथील भागातील पाण्याची समस्या कायमची मिटली जाईल असा दावा महापालिका प्रशासनाने आणि सत्ताधारी शिवसेना उबाठा पक्षाने केला होता. त्यानंतरही या भागातील पाण्याचा निचरा होण्याची समस्या न मिटल्याने याला जोडणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी बंद असल्याने त्या बदलण्यात आल्या, त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने या भागात पाणी साचत असल्याने हिंदमाता उड्डाणपूल व परेल उड्डाणपूल या दरम्यानच्या रस्त्याची उंची १.२ मीटरने वाढवण्यात आली. यानंतरही पाणी तुंबण्याची समस्या कायम राहिल्याने याठिकाणी १५ पंप बसवण्यासाठी तीन वर्षांसाठी ३९ कोटी रुपये खर्च केले. (Mumbai Rain)
पुढे या तुंबणाऱ्या पाण्याचा समस्या दूर करण्यासाठी येथील पाणी पंपिंग करण्यासाठी पंपिग स्टेशन आणि प्रमोद महाजन उद्यान आणि सेंट झेवियर्स येथे पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या आणि येथील पाणी तिथे वाहून नेण्यासाठी नवीन पर्जन्य जलवाहिनीही टाकली. यावर निविदा न काढता सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आजवर हिंदमाता परिसरातील पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे ८०० ते १००० कोटी रुपये खर्च करूनही या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर झालेली नाही. त्यातच सोमवारी पहिल्याच किरकोळ पावसात हिंदमाता परिसरात पाणी तुंबल्याने खरा मोसमी पाऊस अजून बाकी आहे, त्यात या परिसराची स्थिती काय असेल अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आजवर यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community