-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
एरव्ही मुंबई महापालिका पावसाळ्यासाठी सज्ज असली तरी यंदा पावसाने मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून हजेरी लावत महापालिकेच्या सर्व कामांवर पाणी फेरुन टाकले. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि इतर सर्व प्रकारच्या विकासकामांवर शेवटचा हात फिरवला जात असला तरी यंदा पावसाने लवकर हजेरी लावत महापालिकेला खिंडीत गाठले. त्यामुळे एरव्ही मे महिन्यातील समुद्राच्या मोठ्या भरतीची चिंता केली जात नसली तरी यंदा याच मोठ्या भरतीसह पावसानेही हजेरी लावल्यामुळे महापालिकेचे दावे फोल ठरवत शहरातील अनेक भागांना जलमय करू टाकले. आणि रेल्वे तसेच रस्ते वाहतून विस्कळीत करून मे महिन्यातही वरुणराजाने मनात आणले तर काय करू शकतो याची झलक दाखवून दिली. (Mumbai Rain)
(हेही वाचा – Mumbai Rain : दादर धारावी नाल्याकडे दुर्लक्ष; लोकांच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात शिरले पाणी)
मुंबईत रविवारी रात्री अकरा पासून ते सोमवारी सकाळी अकरा पर्यंत कोसळलेल्या विक्रमी पावसाने हिंदमाता, वडाळा, माटुंगा गांधी मार्केट परिसर, दादर टी. टी. शीव टी. टी, मशीद बंदर, लालबाग, काळाचौकी, मंत्रालय परिसर आदी परिसर पाण्याखाली गेले. त्यामुळे मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे विस्कळीत झाली तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होऊन बेस्ट बसेच आणि खासगी वाहनांचे मार्ग बदलण्याची वेळ आली. मुंबई महापालिका प्रशासन हे नेहमी पावसाळा पूर्व कामांची डेडलाईन ३१ मे किंवा ५ जून पर्यंत निश्चित करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करण्याचे नियोजन करते. परंतु यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने आणि त्याला मोठ्या भरतीची साथ मिळाल्याने मुंबईला जलमय करत वरुण राजाने महापालिकेचे कामांवरच पाणी फेरुन टाकले. (Mumbai Rain)
(हेही वाचा – ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं; अन्यथा जनता विचारेल “पावसात तुम्ही कुठे होता?” Ashish Shelar यांचा घणाघात)
एरव्ही पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील मोठ्या भरतीची खबरदारी महापालिका प्रशासन घेत असते. मे महिन्यातील मोठ्या भरतीचा कधीही विचार करण्याची वेळ आली नव्हती. परंतु सोमवारी सकाळी अकरा वाजता ४.७५ मिटर उंचीची भरती असल्याने आणि त्यात शहर भागांमध्ये सरासरी २०० मिमी पावसाची नोंद झाल्याने मुंबईत विविध ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. आजवर महापालिका प्रशासन मे महिन्यातल मोठ्या भरतीची दखल घेत नसल्याने हा प्रकार घडला असून याबाबत प्रशासनाने कोणतेही अलर्ट न दिल्याने आणि आमल्या कर्मचाऱ्यांना कार्यरत न ठेवल्याने मुंबई जलमय झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यंदा प्रथमच मे महिन्यातील भरतीने आपला चमत्कार दाखवून दिल्याने महापालिकेच्या नियोजनाचे तीन तेरा वाजले गेले आणि महापालिकेच्या कामाचा बोऱ्या वाजला केला. निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्याच पावसात रस्त्यालगतच्या गटारांच्या मुखांवर कचरा साचला जात असल्याने पाणी साचण्याचे प्रकार घडतात, पण पावसाने आधीच हजेरी लावली होती आणि हवामान खात्यानेही अलर्ट दिलेला असताना प्रशासनाने या समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीची दखल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना अलर्ट करायला हवे होते, पण तसे न घडल्याने किरकोळ पावसात मुंबई जलयम झाली, असे त्यांनी म्हटले आहे. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community