मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर (Mumbai Pune Expressway) पोलिसांच्या वाहनांचा मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. देशात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे (Pune) या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तब्बल 19 पोलीस वाहनांचा ताफा निघाला होता. पोलिसांचा (Police) हा ताफा रसायनी पोलीस ठाण्याच्या (Rasayani Police Station) हद्दीत भातान बोगद्यात आला असता, त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या 19 वाहनात एकूण तब्बल 160 बांगलादेशी होते. (Mumbai Pune Expressway)
(हेही वाचा – Kedarnath Landslide : जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तीन जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेसवर भातान बोगद्यात आरोपींनी भरलेल्या भरगच्च वाहनांचा सकाळी ०७ वाजून ४६ मिनिटांनी विचित्र अपघात झाला. बोगद्यातून वाहनांचा प्रवास सुरू असताना पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांनी धडकली. त्यात 19 पोलीस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी कैदी असे एकूण 31 जण जखमी झाले, असून जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospitals) उपचार सुरू आहेत.
(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणच्या नागरिकांना मोबाईलमधून व्हॉट्सअप डिलिट करण्याचे आदेश; काय आहे कारण ?)
अपघातामुळे वाहतूक झाली होती विस्कळीत
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील अडथळा दूर करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. दुर्घटनाग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) कर्मचारी विजय माने हे गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत 6 वाहने अपघातग्रस्त झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल (SP Anchal Dalal) यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community