Mumbai Airport Closed : मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील विमान वाहतूक ९ मे रोजी सहा तासांसाठी बंद ठेवले जाणार आहे. देखभालीच्या कामामुळे विमान वाहतूक सहा तासांसाठी बंद ठेवली जाणार आहे. पावसळ्याआधी हे काम पूर्ण केले जाणार आहे. याबाबतची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने शनिवारी 19 एप्रिलला दिली. (Mumbai Airport closed)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने म्हटले आहे की, ०९/२७ आणि १४/३२ या दोन्ही धावपट्ट्यांवर पावसाळ्याआधी देखभालीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम ९ मे रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल. सर्व भागधारकांना माहिती देण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच विमानचालकांना सूचना देण्यात आली. ज्यामुळे विमान कंपन्या त्यांचे उड्डाण वेळापत्रक वेळेपूर्वीच समायोजित करू शकतील आणि त्यानुसार नियोजन करू शकतील. विमानतळाच्या हवाई पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल महत्त्वाची आहे. पावसळ्यात सुरक्षित लँडिंग आणि टेक ऑफ होईल, यासाठी तज्ज्ञ धावपट्टीची तपासणी करतील, असेही एमआयएएलकडून (MIAL) स्पष्ट करण्यात आले.
(हेही वाचा – IPL 2025, Rajasthan Royals : राजस्थान संघात दुफळी? राहुल द्रविड काय म्हणाला?)
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जागतिक दर्जाचे शहर आहे. देश परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईमध्ये येतात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त असलेले विमानतळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानतळावर एका मिनिटाला तब्बल ३५ विमाने लँडिंग करतात आणि सुमारे ५२०० प्रवासी विमानतळावर उतरतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community