NCERT च्या पुस्तकांतून मोगलांचा इतिहास हद्दपार; भारतीय राजघराणी, महाकुंभ यांचा समावेश

100

‘एनसीईआरटी’च्या (NCERT) इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मोगलांचे (Mughal) उदात्तीकरण करणारा इतिहास आणि दिल्लीतील सुलतानशाही यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्राचीन भारतीय इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ (Maha Kumbh) आणि ‘मेक इन इंडिया’ व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या योजनांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Pakistan Army : भारताच्या कारवाईला पाकिस्तानी सैन्यही घाबरले; हजारो जवानांनी दिला राजीनामा)

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy, एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफएसई) २०२३च्या अनुषंगाने ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार, शालेय शिक्षणामध्ये भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञान व्यवस्था आणि स्थानिक संदर्भाचा समावेश करण्यावर भर देण्यात आला आहे.

हा केवळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये येणार आहे. समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन या प्राचीन भारतीय राजघराण्यांवरील नवीन अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याबरोबरच हिंदु धर्मासह इस्लाम, ख्रिाश्चन धर्म, यहुदी धर्म आणि झोरोस्ट्रियन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख धर्म यांच्यासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या जागा आणि तीर्थक्षेत्रांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या अवतरणाचा संदर्भ देण्यात आला आहे. यापूर्वी मोगल आक्रमकांच्या इतिहासासाठी अनेक पाने देऊन केवळ ५ ओळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देण्यात आला होता. त्यासाठी अनेक राष्ट्रप्रेमींनी लढा दिला होता.

जातिभेदांसाठी ब्रिटिश जबाबदार

वर्ण, जातिव्यवस्थेमुळे सुरुवातीला सामाजिक स्थैर्य मिळाले, मात्र ती नंतर विशेषतः ब्रिटिश राजवटीत ती अधिक ताठर झाली, असेही या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आले आहे. (NCERT)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.