MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेला वेग, लिपिक पदांची २१ हजार पदे भरण्याची मागणी

सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत.

82
MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेला वेग, लिपिक पदांची २१ हजार पदे भरण्याची मागणी
MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रखडलेल्या पदभरती प्रक्रियेला वेग, लिपिक पदांची २१ हजार पदे भरण्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) तब्बल २१ हजार पदांच्या मेगाभरती प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे बहुतांश पदांच्या जाहिराती निघाल्या असून पुढील आठ महिन्यांत भरतीची ही प्रक्रिया पूर्ण होईल.

राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून जागा भरण्यासाठी जशी मागणीपत्रे येतात त्यानुसार, आयोग भरती प्रक्रिया राबवते. गेल्या वर्षभरात राजपत्रित ‘अ’, ‘ब’ आणि अराजपत्रित ‘ब’ गटासह लिपिक पदांकरिता तब्बल २१ हजार पदे भरण्याची मागणी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून करण्यात आली. या पदांची भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर आहे. येत्या ८ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.

(हेही वाचा – Arun Gawli : नवरात्र पाठोपाठ अरुण गवळी दिवाळी घरीच साजरी करणार)

या प्रक्रियेत सर्वाधिक ८ हजार पदे लिपिकांची आहेत, तर अ गटापैकी सर्वाधिक २ हजार पदे वैद्यकीय शिक्षण विभागातील आहेत. डिसेंबरपर्यंत यात आणखी भर पडेल. आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच भरती प्रक्रिया राबवली नव्हती. पदभरती रखडल्यामुळे ऐन उमेदीची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात घालवणाऱ्या लाखो उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष होता, मात्र आता मुंबईबाहेरील लिपिक पदेही आयोगाकडून भरण्यात यावी, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आल्याने यंदा इतक्या मोठ्या संख्येने लिपिक पदे भरली जात आहेत, असे डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले.

राज्य सरकार करत असलेल्या भरतीचे स्वागत आहे, मात्र सरकारच्या विविध विभागांमध्ये लाखो पदे रिक्त आहेत, हा बॅकलॉग भरून काढण्यास ही भरती पुरेशी नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.